विशेष संपादकीय

ट्रॅक्टर-ट्रॉलींवर सक्तीची जीपीएस यंत्रणा – शेतकऱ्यांच्या खांद्यावर नवा भार

जीपीएस म्हणजे सतत वाहनावर नजर ठेवली जाणार. शेतकरी कधी कुठे गेला, किती वेळ राहिला, कोणता माल नेला – हे सर्व…

11 months ago

विकसित अर्थव्यवस्थेसाठी प्रलंबित आर्थिक सुधारणा आवश्यक !

जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये प्रतिकूल अर्थव्यवस्था असताना त्यांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सध्या समाधानकारक वाढीचा अनुभव घेत आहे. जगात सर्वाधिक वेगाने…

11 months ago

डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये अद्ययावत सुरक्षा यंत्रणा उभारण्याची गरज !

विशेष आर्थिक लेख गेल्या दशकात डिजिटल अर्थव्यवस्थेने आपण अभूतपूर्व यश मिळवलेले आहे. मात्र त्याचवेळी या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या…

11 months ago

मुंबईचं लंडन होणं – स्वप्न की शक्यता ?

“मुंबईचं लंडन होणं – हे स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं आहे, पण ते प्रत्यक्षात आणायचं असेल, तर प्रत्येक नागरिकाने शिस्त, जबाबदारी,…

11 months ago

ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’चा बडगा, आत्मनिर्भरतेसाठी मोठी संधी ?

विशेष आर्थिक लेख अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करून भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर 25 आयात शुल्क लादले आहे. त्याचबरोबर…

11 months ago

वर्क फ्रॉम होम” जागतिक संकल्पना अडचणीत ?

विशेष आर्थिक लेख कोरोना महामारीच्या काळामध्ये जास्त लोकप्रिय झालेली 'वर्क फ्रॉम होम' म्हणजे 'घरून काम करण्याची' संकल्पना जागतिक सर्वेक्षणात अडचणीची…

11 months ago

वादग्रस्त मंत्र्यांना अभय की वेळकाढूपणा ?

गेले चार- पाच दिवस महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना हटवणार अशा बातम्या मिडियातून रोज झळकत आहेत. चार मंत्र्यांना डच्चू देणार तर…

11 months ago

अजूनही जिवंत आहे गांधी…

गांधीना त्यांच्या हत्येनंतरही त्यांच्या प्रतिमेवर हल्ला करून पुन्हा पुन्हा मारलं जात आहे. एवढं करूनही गांधी शेवटी या जगात उरतोच !…

11 months ago

आर्थिक असमानता कमी करण्यासाठी गंभीर प्रयत्नांची गरज !

विशेष आर्थिक लेख जागतिक बँकेने 167 देशांचा गरिबी व समानतेबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात भारतातील गरिबी, असमानता याचा प्रामुख्याने उल्लेख आहे.  त्यावरून  देशात…

12 months ago

शिवरायांचा प्रताप जगव्यापी – १२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गडकिल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशा १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्को या जागतिक संस्थेच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनाची शिफारस झाल्याने महाराष्ट्राच्या गौरवात भर पडली आहे. प्रवीण टाके, उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोबतच सामान्य जनतेने देखील गड-किल्ल्यांवर जाऊन आपला आनंद व्यक्त केला. आपला इतिहास प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक असतेच. या शिवाय इतिहासातून लढण्याची प्रेरणा मिळते. भविष्याची रणनीती ठरवण्याची दिशा मिळते. येणाऱ्या पिढ्यांना आपल्या पूर्वजांसह जुनी संस्कृती अभ्यासाता येते. त्यामुळे ऐतिहासिक दुर्ग आपले कायम प्रेरणास्त्रोत आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात निर्माण झालेले हे दुर्ग महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीची साक्ष देणारे ठरते. सोबतच अल्प आयुष्यात सुद्धा जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर तुम्ही भीम पराक्रम जगापुढे ठेवू शकता. हजारो वर्ष येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करू शकता असा वस्तूपाठ छत्रपती शिवरायांच्या या 12 किल्ल्यांनी महाराष्ट्राला, देशाला दिला होता. आता हा दूरदृष्टीचा वारसा यानिमित्ताने जागतिक झाला आहे.  युनेस्को ; कार्य आणि भूमिका युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) या संस्थेची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून शांतता व सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली. युनेस्कोचा उद्देश म्हणजे जगातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचे जतन करणे, जपणे आणि जागतिक समुदायात त्यांची ओळख निर्माण करणे. यासाठी "World Heritage Convention, 1972" तयार करण्यात आले. भारताने १९७७ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा करारावर स्वाक्षरी केली. तेव्हापासून अनेक स्थळांना या यादीत मान्यता मिळाली आहे. सध्या भारतात जवळपास ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत (२७ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक, १ मिश्र स्वरूपाची व इतर प्रस्तावित).यामध्ये राजस्थानच्या गडकिल्ल्यांचाही सहभाग होता. महाराष्ट्राचे गड किल्ले मात्र दुर्लक्षित होते. यानिमित्ताने त्याकडे जागतिक लक्ष वेधले गेले आहे. भारतातील स्थळांची शिफारस केंद्र सरकार अंतर्गत भारतीय पुरातत्व विभाग करतो. राज्य सरकार, स्थानिक संस्था आणि तज्ज्ञांच्या मदतीने केंद्र सरकार युनेस्कोला प्रस्ताव सादर करते.  पराक्रमाच्या १२ यशोगाथा…

12 months ago