काय चाललयं अवतीभवती

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

बार्शी (जि. सोलापूर) येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन कवी कालिदास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गेली 31 वर्ष कवी कालिदास मंडळ साहित्याच्या क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे या हेतूने मंडळाच्यावतीने दरवर्षी नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहास मेघदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यानुसार जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहास या वर्षी जुलै मध्ये होणाऱ्या कालिदास महोत्सवामध्ये ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्राप्त झालेल्या संग्रहातून दोन संग्रहांची निवड या पुरस्कारासाठी केली जाणार आहे. हे मेघदूत पुरस्कार साहित्यिक पं. ना. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कवी मुकुंदराज कुलकर्णी यांच्यावतीने व ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश गव्हाणे यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून कवींनी दिनांक २० जून २०२४ पर्यंत काव्यसंग्रहाच्या तीन प्रती पाठवाव्यात, असे आवाहन कालिदास मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांच्यासाठी 8485040023 या मोबाईलवर संपर्क करावा.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
प्रकाश गव्हाणे, ईश्वरी अभ्यासिका, पाटील प्लॉट, शिवाजी नगर, बार्शी ता. बार्शी जिल्हा सोलापूर पिन ४१३४११ (मो. ९७६३४६६८३०)

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

12 hours ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

21 hours ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

2 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

2 days ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

2 days ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

2 days ago