On behalf of Warnanagar Branch Sahitya Parishad, an appeal to send literary works for awards
कोल्हापूर – वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१ जानेवारी,२०२२ ते ३१ डिसेंबर, २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेल्या विविध साहित्य प्रकारातील ग्रंथांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. कादंबरीसाठी तात्यासाहेब कोरे पुरस्कार, कवितासंग्रहासाठी सावित्रीआक्का कोरे पुरस्कार, कथा साहित्यासाठी शोभाताई कोरे पुरस्कार, विज्ञान व संकिर्ण साहित्यासाठी विलासराव कोरे पुरस्कार, बाल साहित्यासाठी मामासाहेब गुळवणी पुरस्कार दिले जाणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व वारणानगर शाखेच्या वतीने नोव्हेंबर २०२४ मध्ये वारणानगर येथे होणाऱ्या विभागीय साहित्य संमेलनामध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगरचे अध्यक्ष विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत संस्थेचे कार्याध्यक्ष ग्रंथमित्र के. जी. जाधव यांनी साहित्यिकांना पुस्तके पुरस्कारासाठी पाठवण्याचे आवाहन केले आहे.
तसेच कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यातील एका ज्येष्ठ साहित्यिकाला सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे साहित्यसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. साहित्यगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या आवश्यकता नाही. रोख रक्कम, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेरील लेखकांनी मराठी भाषेत २०२२ व २०२३ या दोन वर्षांत प्रकाशित केलेल्या पुस्तकांना पहिल्या वर्षीचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
साहित्यिकांनी पुस्तकांच्या दोन प्रति फोटो व आपली माहिती ३१ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत कार्याध्यक्ष, ग्रंथमित्र- के. जी. जाधव, मुक्काम पोस्ट बहिरेवाडी, तालुका- पन्हाळा, जिल्हा- कोल्हापूर पिन कोड नंबर-४१६११३ या पत्त्यावर पाठवावीत असे आवाहन पुरस्कार संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८२२१३३५६२, ९८३४३४२१२४
कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…
एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…
पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…
धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…