वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी वाचनसंस्कृती…
जुन्नरचा २००० वर्षांचा समृद्ध इतिहास आता एकाच ग्रंथात असे घडले जुन्नर’ ग्रंथाचे थाटात प्रकाशन पुस्तकांचे गाव या संकल्पनेप्रमाणे इतिहास साक्षर…
जुन्नरच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा, सांस्कृतिक वारशाचा आणि वर्तमानाचा सर्वांगाने वेध घेणाऱ्या प्रा. डॉ. लहू गायकवाड लिखित ‘असे घडले जुन्नर’ या…
पुण्यश्लोक कीर्तीशालिनी अहिल्याबाई होळकर जन्मत्रिशताब्दी वर्ष विशेष (३१ मे १७२५ – ३१ मे २०२५)३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी…
तृप्ती धोडमिसे ठरल्या कुडोपीला भेट देणाऱ्या पहिल्या जिल्हाधिकारी सिंधुदुर्गनगरी : ‘युनेस्को’सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने दखल घेतलेली अश्मयुगीन कातळशिल्पे हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा…
सध्या नरनाळा महोत्सवानिमित्त नरनाळा किल्ला चर्चेत आहे. पण शासनाकडून, प्रशासनाकडून आणि अभ्यासकांकडून त्याबद्दल चुकीची माहिती प्रस्तुत केली जात आहे. ह्याबद्दल…
तुम्ही तंजावरमधील मराठा समाधी संकुलाच्या नूतनीकरणाला पाठिंबा देण्यास इच्छुक असल्यास, तुम्ही GPay किंवा UPI द्वारे mailstorpb@okhdfcbank वर देणगी देऊ शकता…
कणकवली - येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात १६ व १७ जानेवारी, २०२६ रोजी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे…
तामिळनाडूतील गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात आदि तिरुवथिराई महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण… वणक्कम चोळा मंडलम! परम आदरणीय अधिनस्थ मठाधीशगण,…
१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गडकिल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशा १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्को या जागतिक संस्थेच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनाची शिफारस झाल्याने महाराष्ट्राच्या गौरवात भर पडली आहे. प्रवीण टाके, उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोबतच सामान्य जनतेने देखील गड-किल्ल्यांवर जाऊन आपला आनंद व्यक्त केला. आपला इतिहास प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक असतेच. या शिवाय इतिहासातून लढण्याची प्रेरणा मिळते. भविष्याची रणनीती ठरवण्याची दिशा मिळते. येणाऱ्या पिढ्यांना आपल्या पूर्वजांसह जुनी संस्कृती अभ्यासाता येते. त्यामुळे ऐतिहासिक दुर्ग आपले कायम प्रेरणास्त्रोत आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात निर्माण झालेले हे दुर्ग महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीची साक्ष देणारे ठरते. सोबतच अल्प आयुष्यात सुद्धा जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर तुम्ही भीम पराक्रम जगापुढे ठेवू शकता. हजारो वर्ष येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करू शकता असा वस्तूपाठ छत्रपती शिवरायांच्या या 12 किल्ल्यांनी महाराष्ट्राला, देशाला दिला होता. आता हा दूरदृष्टीचा वारसा यानिमित्ताने जागतिक झाला आहे. युनेस्को ; कार्य आणि भूमिका युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) या संस्थेची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून शांतता व सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली. युनेस्कोचा उद्देश म्हणजे जगातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचे जतन करणे, जपणे आणि जागतिक समुदायात त्यांची ओळख निर्माण करणे. यासाठी "World Heritage Convention, 1972" तयार करण्यात आले. भारताने १९७७ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा करारावर स्वाक्षरी केली. तेव्हापासून अनेक स्थळांना या यादीत मान्यता मिळाली आहे. सध्या भारतात जवळपास ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत (२७ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक, १ मिश्र स्वरूपाची व इतर प्रस्तावित).यामध्ये राजस्थानच्या गडकिल्ल्यांचाही सहभाग होता. महाराष्ट्राचे गड किल्ले मात्र दुर्लक्षित होते. यानिमित्ताने त्याकडे जागतिक लक्ष वेधले गेले आहे. भारतातील स्थळांची शिफारस केंद्र सरकार अंतर्गत भारतीय पुरातत्व विभाग करतो. राज्य सरकार, स्थानिक संस्था आणि तज्ज्ञांच्या मदतीने केंद्र सरकार युनेस्कोला प्रस्ताव सादर करते. पराक्रमाच्या १२ यशोगाथा…