काय चाललयं अवतीभवती

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी वाचनसंस्कृती बळकट करणे ही काळाची गरज असून, इतिहासाचे वाचन आणि चिंतनातूनच सुराज्याचा मार्ग प्रशस्त होईल, असे प्रतिपादन संयोगिताराजे छत्रपती यांनी केले. वाचनकट्ट्यासारख्या संस्था समाजात इतिहास आणि संस्कार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोल्हापूर : “राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शिवभक्त होते. आज देशाला स्वराज्याबरोबरच सुराज्याचीही नितांत गरज आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी वाचनाच्या माध्यमातून इतिहास रुजविणे आवश्यक आहे. वाचनकट्ट्यासारख्या संस्था हे महत्त्वाचे कार्य करत आहेत. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी सदैव रयतेचा विचार केला. त्यांचे विचार समाजात पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या युवकांची आहे,” असे प्रतिपादन संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.

वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘प्रगल्भ वाचक स्पर्धा’ पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमास राज्य कर विभागाचे सहआयुक्त संजय पवार, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विनय पाटील होते.

कोल्हापूर येथील श्री प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस येथे झालेल्या या कार्यक्रमात कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके, पुस्तके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

भाषेमधून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण

प्रा. डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, “‘असे होते आपले शाहू महाराज’ या पुस्तकावर आधारित आयोजित प्रगल्भ वाचक स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भाषेमधून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. शाहू महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान वाचनकट्ट्याने समर्थपणे पेलले आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे शाहू महाराजांचे समाजजीवनातील योगदान या उपक्रमातून प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे.”

वाचनकट्ट्याचे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण

सहआयुक्त संजय पवार म्हणाले, “वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी आणि शाहू महाराजांचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी वाचनकट्ट्याचे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. शाहूंच्या विचारांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची दिशा निश्चित करावी.”
अध्यक्षीय समारोपात प्रा. विनय पाटील म्हणाले, “शाहू महाराजांचे विचार केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. वाचनकट्ट्याने समाजासमोर विचारांची समृद्ध खाण उपलब्ध करून दिली आहे.”

प्रास्ताविक युवराज कदम यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पुस्तके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. यावेळी नगरसेवक उमेश पवार, सामाजिक कार्यकर्ते, सतीश पवार, प्रा. संभाजी सावंत, नितीन शिंदे, दिपक परिट, सुनील मोरे, प्रकाश देसाई, प्रा. डॉ. सुनील देसाई, धनश्री पवार, वनिता कदम, डॉ. लीलावती पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन संजीवनी कदम यांनी केले, तर प्राचार्य डॉ. रेखा निर्मळे यांनी आभार मानले.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: BooksChhatrapati Shivaji MaharajCivic Valuescultural heritageCultureDemocracyEducationeducation awarenessEmpowermentGood Governancegovernanceheritageheritage conservationHistorical Awarenesshistorical legacyHistoryhistory educationIndian CultureIndian historyinspirationIye Marathichiye NagariKolhapurleadershipLegacyLibraryLiteratureMaharashtraMarathi Newsnation buildingpublic awarenesspublic speechRajarshi Shahu Maharajreading cultureReading ForumReading MovementrulerSanyogitaraje ChhatrapatiShiv Bhaktisocial changesocial reformsocial responsibilitysocietySurajyaSwarajyaTraditionvaluesvisionWelfare Stateyouthyouth developmentइतिहासइतिहास संवर्धनइतिहासप्रेमइतिहासवाचनइये मराठीचिये नगरीऐतिहासिक वारसाकोल्हापूरग्रंथछत्रपती शिवाजी महाराजजनकल्याणजनजागृतीनागरिकनेतृत्वपरंपरापुस्तकेप्रेरणाप्रेरणादायीमराठीमहाराष्ट्रमहाराष्ट्र बातम्यामूल्येयुवकयुवकशक्तीरयतराजर्षी शाहू महाराजराष्ट्रनिर्माणलोककल्याणलोकनेतेलोकाभिमुख शासनवाचनवाचनकट्टावाचनसंस्कृतीवारसाविचारविचारधाराव्याख्यानशिक्षणशिक्षणप्रेरणाशिवभक्तीसमाजसमाजजागृतीसंयोगिताराजे छत्रपतीसंस्कारसंस्कृतीसामाजिक परिवर्तनसामाजिक सुधारणासांस्कृतिक वारसासुराज्यसुशासनस्वराज्य

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

3 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

16 hours ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago

पत्रकारांनी जरूर वाचावे असे पुस्तक ‘वार्तांच्या झाल्या कथा’ News in the form of stories

दैनिक सकाळ मध्ये प्रदीर्घकाळ कार्यरत असणारे राजीव साबडे यांनी स्वतःच्या अनुभवांवर लिहिलेले वार्तांच्या झाल्या कथा…

2 days ago