काय चाललयं अवतीभवती

दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स कोल्हापूर केेंद्र अध्यक्षपदी अजय देशपांडे सचिवपदी योगेश चिमटे

कोल्हापूर दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) कोलकत्ता या शिखर संस्थेच्या कोल्हापूर स्थानिक केंद्राच्या अध्यक्षपदी इंजि. अजय देशपांडे आणि मानद सचिव पदी इंजि. योगेश चिमटे यांची निवड करण्यात आली.

इंजि. अजय देशपांडे हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांनी सिंचन व निचरा अभियांत्रिकी, पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन, कृषी यंत्रे व औजारे, हरितगृह तंत्रज्ञान ई. क्षेत्रामध्ये एकूण ३८ वर्षापासून अध्यापन, मार्गदर्शन केले आहे. तसेच इंजि. योगेश चिमटे हे कोल्हापुरातील नामांकित डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे या ठिकाणी संगणक अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विविध शोधनिबंध सादर केले आहेत.

संस्था संचालकपदी जयदीप बागी, बलराम महाजन, प्रदीप कुलकर्णी, मंजुषा सरनोबत, विजय भांबुरे, दादासो देसाई, श्रीकांत कदम, संजय सावंत, विनायक फास्के, बाळासाहेब पाटील, अर्जुन कोळी, सुनील पाटील, मनोज चव्हाण, संजय इंगळे आणि उदय पाटील यांची निवड करण्यात आली.
यासंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ( ता १० ) इंजि. आर. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेचे मानद सचिव इंजि. संजय खोत यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सभा खेळीमेळीत पार पडली.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

1 hour ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

10 hours ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

1 day ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

1 day ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

2 days ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

2 days ago