Appeal to submit literary works for Ranshivar Literary Award
सोलापूर – शेळवे ( ता. पंढरपूर ) येथील बळीराजा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य व साहित्यिकांना आणि त्यांच्या लेखणीला प्रेरणा देण्यासाठी विविध पुरस्कार देण्यात येतात.
यंदा कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य आणि ललित ( आत्मकथन, चरित्र, ललित ) या साहित्यकृतींपैकी उत्कृष्ट ५ साहित्यकृतींना राज्यस्तरीय रानशिवार साहित्य पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. तरी साहित्यिकांनी २०२३ तसेच २०२४ या दोन वर्षात प्रकाशित झालेले साहित्य पुरस्कारासाठी दोन प्रतीत पाठवावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गाजरे यांनी केले आहे.
प्रस्ताव पाठवताना सोबत २ साहित्यकृती अल्प परिचय पाठवावा. कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य आणि ( आत्मकथन, चरित्र आणि ललित यापैकी एक) साहित्यकृती पाठविण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२५ अशी आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे.
पुस्तके पाठविण्याच पत्ता –
प्रकाश ज्ञानोबा गाजरे, अध्यक्ष, बळीराजा प्रतिष्ठान
बळीराजा कृषी सेवा केंद्र, शेळवे
ता. पंढरपूर, जि. सोलापूर 413304
अधिक माहितीसाठी संपर्क – 9766643066, 9763326655
वैशाली पाटील, सीमा क्षीरसागर यांना शेती-पाणी पुरस्कार; चार मान्यवरांना साहित्य पुरस्कार मुंबई : यशवंतराव चव्हाण…
राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्थांना संधी मुंबई :…
नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (NCDC) कायद्यातील 2026 मधील दुरुस्तीला अखिल भारतीय किसान…
महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील हजारो इच्छुक उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही आशेचा किरण ठरली…
ज्ञानेश्वरीतील ही ओवी साधकाला बाह्य जगाच्या धावपळीपासून अंतर्मुख शांततेकडे घेऊन जाते. ‘तैसे राहोनि ठायठिके’ म्हणताना…
पुण्याचे डिजिटल शिखर १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात पार पडलेली 'ब्रिक्स आयसीटी…