May 2, 2026
Appeal to submit literary works for Ranshivar Literary Award
Home » रानशिवार साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

रानशिवार साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

सोलापूर – शेळवे ( ता. पंढरपूर ) येथील बळीराजा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य व साहित्यिकांना आणि त्यांच्या लेखणीला प्रेरणा देण्यासाठी विविध पुरस्कार देण्यात येतात.

यंदा कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य आणि ललित ( आत्मकथन, चरित्र, ललित ) या साहित्यकृतींपैकी उत्कृष्ट ५ साहित्यकृतींना राज्यस्तरीय रानशिवार साहित्य पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. तरी साहित्यिकांनी २०२३ तसेच २०२४ या दोन वर्षात प्रकाशित झालेले साहित्य पुरस्कारासाठी दोन प्रतीत पाठवावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गाजरे यांनी केले आहे.

प्रस्ताव पाठवताना सोबत २ साहित्यकृती अल्प परिचय पाठवावा. कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य आणि ( आत्मकथन, चरित्र आणि ललित यापैकी एक) साहित्यकृती पाठविण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२५ अशी आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे.

पुस्तके पाठविण्याच पत्ता –
प्रकाश ज्ञानोबा गाजरे, अध्यक्ष, बळीराजा प्रतिष्ठान
बळीराजा कृषी सेवा केंद्र, शेळवे
ता. पंढरपूर, जि. सोलापूर 413304
अधिक माहितीसाठी संपर्क – 9766643066, 9763326655

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या ‘जपलाला कनवटीचा’ काव्यसंग्रहाचे १८ रोजी प्रकाशन

पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे

माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता सैन्य भरती

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!