काय चाललयं अवतीभवती

त्रैमासिक वारुळ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूरः साहित्य व समीक्षेच्या प्रवाहाला वाहिलेले वारूळ हे मराठी त्रैमासिक मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे सुरू आहे. या वर्षी वारूळ त्रैमासिकच्या वतीने त्रैमासिक वारूळ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ सतेज दणाणे यांनी दिली आहे.

या वर्षीच्या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, समीक्षा किंवा संपादन, नाटक आणि आत्मकथन या प्रकारातील साहित्य मागविण्यात आले आहेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या २प्रती,अल्पपरिचय आणि पासपोर्ट फोटोसह प्रस्ताव केवळ पोस्टानेच (कुरीयरने पाठवू नये) ३० एप्रिल २०२४ पर्यंत पाठवावे असे आवाहन वारूळ त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक डॉ. सतेज दणाणे यांनी एका निवेदनाद्वारे केलेले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता – डॉ. सतेज दणाणे (भ्र.९४०४७६१४२७), द्वारा नंदिनी दळवी, सम्राटनगर गार्डनच्या मुख्य गेटसमोर, सम्राट नगर, कोल्हापूर

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

14 hours ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

23 hours ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

1 day ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

2 days ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

2 days ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 days ago