Hirav Pakharu Poem by Vinayak Joshi
हिरव्या रानी “हिरवं पाखरू”
अवचित येऊन लागलं फिरू
चुकवून डोळा उभं बांधावर
कुठून आलं त्या कसं विचारू
नजर शोधते काय हेरते
बाई मोठी सराईत वाटते
हिरव्या पोपटा लाल चोच
जशी कुणाची वाट पहाते!
अंग शेलाट नजर भिरभिरती
तिरक्या नजरेने काय शोधती
हाती भेंडीचा “फोक घेऊनी”
धावतेय कोणत्या वळू मागुती
केस मोकळे “शहरी” वाटते
पदर “खोचून” चापून चोपून
लक्ष कुणावर ठेवलंय रोखून
थांगपत्ता न तो देई लागून
पायी पैजण नवीन वाटती
वाट कुणाची पहात उभी ती
सांज समयाला असं पाखरू
येईल का जाळ्यात आपल्या ती
अशा निवांत भलत्या क्षणाला
उभी एकली कां बर राहीली
चौकशी कराया हवी आपणा
आपल्या गावी जबाबदारी आपली
विनायक जोशी
ठाणे
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…