Hirav Pakharu Poem by Vinayak Joshi
हिरव्या रानी “हिरवं पाखरू”
अवचित येऊन लागलं फिरू
चुकवून डोळा उभं बांधावर
कुठून आलं त्या कसं विचारू
नजर शोधते काय हेरते
बाई मोठी सराईत वाटते
हिरव्या पोपटा लाल चोच
जशी कुणाची वाट पहाते!
अंग शेलाट नजर भिरभिरती
तिरक्या नजरेने काय शोधती
हाती भेंडीचा “फोक घेऊनी”
धावतेय कोणत्या वळू मागुती
केस मोकळे “शहरी” वाटते
पदर “खोचून” चापून चोपून
लक्ष कुणावर ठेवलंय रोखून
थांगपत्ता न तो देई लागून
पायी पैजण नवीन वाटती
वाट कुणाची पहात उभी ती
सांज समयाला असं पाखरू
येईल का जाळ्यात आपल्या ती
अशा निवांत भलत्या क्षणाला
उभी एकली कां बर राहीली
चौकशी कराया हवी आपणा
आपल्या गावी जबाबदारी आपली
विनायक जोशी
ठाणे
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…