jagva-re-jagva-poem-by-shripad-bhalchandraj-joshi
तख्त राखणार ही
कोणाचे किती किती
दिल्लीच्या तख्तावर
बघू मराठी कधी
अमृताशी जिंकून पैजा
वाट्याला काय तिच्या
राज्य तिच्या नावाने
वाट्याला काय हिच्या
मिरवतो, फिरवतो
द्वाहीच फक्त तो
नावाने तिच्या
सत्ता जो भोगतो
तोंडदेखले तिचे
करून फक्त सोहळे
ठेऊनी गहाण तिजला
राज्य करणाराच निजला
मागू नका रे जोगवा
भीकही मागू नका
याचनाही फार झाली
वंचना साहू नका
जागवा रे जागवा
खदखदा हलवून यांना
मिळणार नाही मत एकही
ठणकावूनी सांगा तयांना
ऐकावयाला तितकीच येते
ही मराठी जयांना, भरभरून
देते जशी,दाखवा ना एकदा
काढूनही नेते कशी
होत हुजरेच नुसते
मुजरेच फक्त करू नका
तख्तही ते तयांचे
मराठी वाकवून मागते
ही मराठी आज अपुला
अधिकार आहे मागते
भीक नाही, आपले
तख्त आहे मागते
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…
https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…