काय चाललयं अवतीभवती

मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे संत वाड़्मय पुरस्कार जाहीर

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे देण्यात येणारे संत वाड़्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा या पुरस्कार योजनेसाठी संस्थेकडे ३२ पुस्तके परीक्षणासाठी उपलब्ध झाली होती. याचे परीक्षण डॉ. राधाताई गोडबोले आणि डॉ. रजनीताई पतकी या दोन परीक्षकांनी केले. त्यांनी विविध गटामध्ये पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड केली, अशी माहिती कार्यवाह म. व. देवळेकर यांनी दिली आहे.

संत वाड़मय पुरस्काराचे यंदाचे हे २७ वे वर्ष आहे. परीक्षकांनी पुरस्कारासाठी निवड केलेली पुस्तके अशी –

गट क्र. १ ( चिंतनपर, विवेचनपर पस्तके )
(पुरस्कार रक्कम लेखकांना ६० % आणि प्रकाशकांना ४० % दिली जाते)
प्रथम क्रमांक ( पुरस्कार रु.८०००/- ) – पाऊले तुकोबांची – लेखक : डॉ. विश्वास मोरे, प्रकाशक : जगद्गुरु प्रकाशन, भंडारा डोंगर, इंदोरी, पुणे.
द्वितीय क्रमांक ( पुरस्कार रु. ६०००/-) – विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंभ – लेखक : रोहन विजय उपळेकर, प्रकाशक : श्रीहरिपाठ सेवा प्रतिष्ठान, फलटण, सातारा
तृतीय क्रमांक ( पुरस्कार रु.४०००/-) – विभागून
१) आद्य श्रीशंकराचार्य -कृत सर्व-वेदांत-सिद्धांत-सार-संग्रह – लेखक : प्रा. डॉ. के. वा. आपटे – प्रकाशक : नारायण केशव आपटे, सांगली.
२) पुर्णकळा – लेखक : नारायण रघुनाथ देशपांडे, प्रकाशक : गायत्री गोविंद कुलकर्णी

विशेष पुरस्कार (पुरस्कार रु. ३०००/- फक्त लेखकासाठी)
१) क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर – लेखक : डॉ. श्यामा घोणसे, संपादक : भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन
२) || श्रीगणेशगीतासार || – लेखक: विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे, प्रकाशक : लतिका प्रकाशन. पुणे.

गट क्र. २ ( संत जीवन – ललित साहित्य )
( पुरस्कार रक्कम लेखकांना ६० % आणि प्रकाशकाना ४० % दिली जाते .)
( पुरस्कार रक्कम रु. २५००/- प्रति पुस्तक)
१) षट् – पंचाशिका – लेखक: प्रा. डॉ. के. वा. आपटे, प्रकाशक : नारायण केशव आपटे, सांगली.
२) सार्थ श्रीरामगीता – लेखक : डॉ. सौ. सुनीती सहस्रबुद्धे, प्रकाशक : श्री. बा. ढवळे

या पुरस्कारांचे वितरण २२ नोव्हेंबर २०२५ (शनिवार ) या दिवशी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत मनोहर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी पुणे ४४ येथे होणार आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

10 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

15 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

24 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago