कविता

झाडं आज पोरकी झाली…

झाडं आज पोरकी झाली...


आज...
होती...झाडं स्तब्ध.. निशब्द...
कारण...
त्यांची आई...त्यांची माय...
आज त्यांना सोडून गेली
झाडं आज पोरकी झाली
ती जन्मली.. अशीच
114 वर्षांपूर्वी
एका मजुराघरी...
वाढली... मोठी झाली
लग्न झालं अन..
सून होऊन गेली मजुराघरी
पण...
तिच्या संसार वेलीवर...
कळी लागली नाही...
फुल उमलले नाही...
माता होण्याच भाग्य
तिला काही लाभले नाही...
कोण म्हणालं... वैद्य पहा..
कोण म्हणे... देवाचं बघ...
तर कोणी 'मूल' दत्तक घे म्हणाले
पण
हिने कोणाचेच नाही ऐकले...
'वांझ'पण घेऊन ती जगत होती
जगण्यात गाणं शोधत होती...
पण
वांझ या शब्दानं
जग तिला मारत होतं...
तिने निर्णय घेतला...
स्वतःची बाळं तयार करण्याचा
अनं वाढवण्याचा...
वडाच्या फांदया...
तिने पृथ्वीच्या गर्भाशयात रोवल्या...
आणि लेकरं जन्मू लागली...
ती त्यांना जपू लागली
सांभाळू लागली
हवं नको ते पाहात होती
बाळ मोठी होत होती...
दरवर्षी ती दहा लेकरांची...
स्वतःच वांझंपण घालवत
माय होत होती
तिने झाडं लावली
वाढवली... लेकरांची उणीव
अशी भरून काढली
अखेर... वांझ शब्द गेला
आणि
वृक्ष माता ही तिची
ओळख झाली...
शेकडो लेकरांची माय...
गुणी लेकरांची माय...
पाखरांना घर देणारी लेकरं..
येणा जाणाऱ्याला सावली देणारी लेकरं
शेकडो वडाची झाडं...
आणि
त्यांची माय सालूमर्दा थीमक्का
या झाडांचीं माय...
पद्मश्री झाली...
तरीही तिने
झाडांच मायपण नाही सोडलं
ती झाडांची मायचं राहिली...
ती माय आज सोडून गेली
सकाळी झाडावरून थेंब अंगावर पडले
धुकं नितळते,
असं वाटत होतं...
पण ते धुक्याचं नितळणं नव्हतं आज...
ते झाडांचे रुदन होतं...
हे बातमी पाहून कळलं
थीमक्काचं निधन झालं...
झाडं आज पोरकी झाली
त्यांची माय त्यांना सोडून गेली

- डॉ. व्ही. एन. शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

7 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

20 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago