कविता

सुखाचा पाऊस आलाच नाही

सुखाचा पाऊस आलाच नाही

दोन बिघा जमीनीतला पाऊन तुकडा
समृद्धी महामार्गात काय गेला
पैशाची लॉटरी लागली
आणि सुबत्तेचा पाऊस पडला
घर गाडी चैनीच्या सुखोपयोगी
वस्तूंची हौसमौज करण्यात
सारा पैसा आला तसा गेला

वडिलोपार्जित शेतीच्या
चतकोर तुकड्यात
आता काय ऊगवायचं?
पश्चात्तापाच्या पावसा शिवाय
उरला फक्त दुःखाचा पाऊस
सुखाचा पाऊस
बळीराजाच्या
पुढच्या पिढीलाही
कायमचाच बंद झाला

आणि तो फक्त
बातम्या ऐकत राहिला
कुठे महापूर
कुठे पावसामुळे
दरडी कोसळून गाव संपले
कुठे कोरडाठाक दुष्काळ
तर कुठे अवकाळी

त्यांनी समृद्धी महामार्ग जोडले
त्यांचे रस्ते समृद्ध पावसात भिजले
इकडे मात्र दोन बिघा जमीनीवर
पेरणी कधी झालीच नाही

जमीनीचा चतकोर तुकडाही
दुःखाच्या पावसात लुप्त झाला
पुन्हा सुखाचा पाऊस
आलाच नाही….

कवी : चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर , धुळे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

4 hours ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

17 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

19 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 day ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 days ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago