📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 21, 2026
कविता

सुखाचा पाऊस आलाच नाही

Sukhacha Paus Aalach Nahee Chandrashekhar Kasar Poem

सुखाचा पाऊस आलाच नाही

दोन बिघा जमीनीतला पाऊन तुकडा
समृद्धी महामार्गात काय गेला
पैशाची लॉटरी लागली
आणि सुबत्तेचा पाऊस पडला
घर गाडी चैनीच्या सुखोपयोगी
वस्तूंची हौसमौज करण्यात
सारा पैसा आला तसा गेला

वडिलोपार्जित शेतीच्या
चतकोर तुकड्यात
आता काय ऊगवायचं?
पश्चात्तापाच्या पावसा शिवाय
उरला फक्त दुःखाचा पाऊस
सुखाचा पाऊस
बळीराजाच्या
पुढच्या पिढीलाही
कायमचाच बंद झाला

आणि तो फक्त
बातम्या ऐकत राहिला
कुठे महापूर
कुठे पावसामुळे
दरडी कोसळून गाव संपले
कुठे कोरडाठाक दुष्काळ
तर कुठे अवकाळी

त्यांनी समृद्धी महामार्ग जोडले
त्यांचे रस्ते समृद्ध पावसात भिजले
इकडे मात्र दोन बिघा जमीनीवर
पेरणी कधी झालीच नाही

जमीनीचा चतकोर तुकडाही
दुःखाच्या पावसात लुप्त झाला
पुन्हा सुखाचा पाऊस
आलाच नाही….

कवी : चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर , धुळे.

Related posts

कविता म्हणजे स्वतःचे स्वतःच्या साठी मस्त जगणे…

अद्याक्षरावरून कविता ” गुरुपौर्णिमा “

दाढीवाले…काल,आज आणि उद्या

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406