कविता

त्यांनाच म्हणती आजकाल खरे शेतकरी नेते…

ॲड.लखनसिंह कटरे हे युवक असताना संघर्ष वाहिनिशी निगडित राहिले. पुढे शासकीय नोकरीत राहिले. ते ख्यातनाम कवी आहेत. शेतीशी थेट संबंध असल्यामुळे त्यांना शेतकरी प्रश्नाची जाण आहे. वकील असल्यामुळे त्यांना कायद्याचा विळखा कळतो. त्यांची ही कविता बरेच काही सांगते.

त्यांनाच म्हणती आजकाल खरे शेतकरी नेते.

(18 जून या शेतकरी पारतंत्र्य दिवसा निमित्त)

जाता येता टपली मारण्याची ज्यांना हुक्की येते,
त्यांनाच म्हणती आजकाल खरे शेतकरी नेते…

उडता उडता शिटत जाती जे गांडी-तोंडातून
संवादाची पण कधी ना त्यांची हिंमत होते
त्यांनाच म्हणती…

भुईमुगाचे ‘झाड’ पाहून शेतात बहरलेले,
फळ लागले नाही म्हणून जे चुकचुकत होते
त्यांनाच म्हणती…

मोठा, मध्यम, अल्प, अत्यल्प अशी फूटपाडी,
ज्यांची भाषा आणि करणीही सदा असते
त्यांनाच म्हणती…

धानालाच म्हणती भात, तांदूळ तोंडभर घेऊन,
चिखलाची मात्र त्यांना दुरूनच शिसारी येते
त्यांनाच म्हणती…

जगवण्या ठलाल, दलाल, ऐतखाऊ मतदार (?)
शेतकऱ्यांना लुटणे हीच खरी त्यांची नीती असते
त्यांनाच म्हणती…

शेतकऱ्यांना दाखवून ‘फसव्या’ कर्जमाफीचे गाजर
करबुडव्यांचे मोठाले कर्ज ‘खरेच’ राईट-ऑफ होते
त्यांनाच म्हणती…

पारतंत्र्यात कोंबून शेतकऱ्यांचे मूलभूत हक्क,
संविधानही बदलून ¤ ‘परिशिष्ट नऊ’ ¤फुगत जाते
त्यांनाच म्हणती…

उद्योग, व्यापारादि नफादायक धंदे करा कितीही,
शेतकऱ्यांना मात्र धारणाक्षेत्रावर सिलिंगची भूते
त्यांनाच म्हणती…

शेतकऱ्यांनी रहावे सदैव तंगी आणि गरीबीतच
ध्यानीमनी सदा, ज्यांनी जोपासली हीच सारी मते
त्यांनाच म्हणती…

कैवारी सच्चे शेतकऱ्यांचे पाडले जातात बाजूला
फसवे, संदिग्ध बोलबच्चन पसरती जिथेतिथे
त्यांनाच म्हणती…
¤
(*संशोधित संविधानातील परिशिष्ट नऊ मध्ये सर्व शेतकरीविरोधी कायदे समाविष्ट केले जातात, कारण या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्याच्या संवैधानिक वैधते/अवैधतेबाबत, संविधानातील संशोधित अनुच्छेद 31B सहवाचन अनुच्छेद 31A मधील तरतुदीनुसार, कोणत्याही/सर्वोच्च/उच्च न्यायालयातही दाद मागण्यालाच प्रतिबंधित करण्यात आले आहे.)

ॲड.लखनसिंह कटरे,
मो. 96650 41483
बोरकन्हार – 441902, (जि. गोंदिया)

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

5 hours ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

18 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

19 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 day ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 days ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago