अवकाळीचे वातावरण अजूनही टिकूनच – माणिकराव खुळे
      
गेल्या दोन दिवसात खान्देश, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट, गारा, वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन अवकाळीचे वातावरण महाराष्ट्रात अजूनही टिकूनच आहे.        

सध्या मार्गस्थ होत असलेल्या पश्चिमी झंजावाताबरोबरच गुरुवारी (ता.२९ फेब्रुवारीला) पुन्हा एक पश्चिमी झंजावात मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्याच्या पश्चिम किनार पट्टी अरबी समुद्र ते राजस्थानच्या जोधपूर पर्यन्त पसरलेल्या समुद्रसपाटी पासून जवळपास १ किमी. उंचीपर्यंतच्या  हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीच्या आस ह्यांच्या एकत्रित परिणामतून संपूर्ण उत्तर भारतात, शनिवार ( दि.२ मार्चपर्यंत ) विशेषतः १ व २ मार्चला अधिक) जोरदार पाऊस व जबरदस्त बर्फबारी होण्याची शक्यता वाढली आहे.

वातावरणीय परिणामबरोबरच महाराष्ट्रातही, कर्नाटकतील चिकमंगलूर ते महाराष्ट्रातील सातारा रत्नागिरी पर्यन्त समुद्रसपाटी पासून जवळपास १ किमी. उंचीपर्यंतच्या  हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीत पसरलेल्या आसामुळे मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातही  विजा, वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता अजुन ४ दिवस वाढली असुन ती शनिवार ( दि.२ मार्च ) पर्यन्त  टिकून आहे.
        

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

2 hours ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

1 day ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

1 day ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

2 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

2 days ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

3 days ago