मुक्त संवाद

कवितेच्या जन्मा मागची गोष्ट सांगणारा लेखसंग्रह

कविता आली सामोरी….किरण डोंगरदिवे ह्यांनी शोधलेल्या कवितेच्या जन्मकथा

समकालातील महत्त्वाचे कवी, लेखक व मर्मज्ञ समीक्षक म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारे बुलढाणा मेहकर येथील किरण शिवहर डोंगरदिवे यांच्या कविता आली सामोरी हा कवितेच्या जन्मा मागची गोष्ट सांगणारा लेखसंग्रह वाचण्यात आला. एखादी घटना, गोष्ट ,एखादी वेदना, समाज व्यवहार, व्यक्ती व्यक्ती मधील मनोव्यापार याचा परिणाम कवीच्या मनावर होतो आणि कवितेची बीज हळुवार कवीच्या मनोभूमीत पेरले जाऊन कवितेचा जन्म होतो. याच सृजन प्रकीयेचा उलगडा करण्याचा यशस्वी प्रयत्न किरण डोंगरदिवे यांनी या ग्रंथातून केला आहे. किरण  डोंगरदिवे यांच्या स्वतःच्या अतिशय गाजलेल्या शबरी या कवितेच्या जन्मा मागील कथा काही प्रासंगिक कारणामुळे लिहून प्रसिद्ध झाली आणि कविता आली सामोरी या ग्रंथ निर्मितीचा पाया रचला गेला. शबरीच्या निर्मिती मागच्या कथा अनेकांना आवडल्यानंतर इतरही काही प्रसिद्ध कविता मागील कथा वाचकांपर्यंत पोहोचाव्यात हे वाटणे सहाजिकच आहे.

‘कविता आली सामोरी’ या लेखसंग्रहामध्ये कुंजविहारी यांची ‘भेटेन नऊ महिन्यांनी’, कवी विनायक यांची ‘हिरकणी’, लोककवी विठ्ठल वाघ यांची ‘तिफन’, नारायण मुरलीधर गुप्ते यांची ‘माझी कन्या’ राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांची ‘आई’, वा. भा. पाठक यांची ‘खबरदार जर टाच मारून जाल पुढे’, कवी इंद्रजीत भालेराव यांची ‘बाप’, श्री. दि. ईनामदार यांची ‘ॠण’ प्रदीप निफाडकर यांची ‘माझी मुलगी’ आणि कवी किरण डोंगरदिवे  ‘शबरी’ या निवडक दहा कवींची एक प्रसिद्ध कविता घेऊन तिच्या निर्मिती मागची प्रेरणा शोधण्याचा यशस्वी प्रयत्न  किरण डोंगरदिवे यांनी केला आहे.

अतिशय गाजलेल्या या दहा कविता, त्यांच्या निर्मितीमागील कारणमीमांसा, कवींचे अनुभव , संबंधित कविता जन्मा वेळेस असणारी कवीची मनोवस्था याची सुंदर गुंफण वाचतांना ती कविता नव्याने उलगडतात. कविता आणि तिची निर्मिती प्रक्रिया वाचताना वाचकाला आगळीवेगळी अनुभुती मिळते आणि वाचक त्या काव्यनिर्मिती काळात आपसूकच विहार करुन येतो. इथे किरण डोंगरदिवे यांचा हा आगळावेगळा प्रयत्न यशस्वी होतो. 

खरं तर किरण डोंगरदिवे हे स्वतः कवी आणि साहित्य, अभ्यासक आणि चिंतनशील समीक्षक आहेत. परंतु ते या लेखसंग्रहात समीक्षक म्हणून पुर्णतः अलिप्त राहतात आणि कवीच्या अनुभवाची जंत्री आपल्या समोर मांडतात. त्यामुळे या कविता आणि त्यांच्या निर्मितीमागील कथा, प्रेरणा कुठलाही अवजड, ओढून ताणून लावलेला अन्वयार्थ न लावता जशाच्या तशा वाचायला मिळतात. 

किरण डोंगरदिवे यांची बात निकलेंगी ही लेख मालिका सध्या सर्वत्र गाजत आहे. किरण डोंगरदिवे यांची साहित्य सेवा  कुठल्याही राजकारणाचा भाग न होता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, न थकता नियमित सुरू आहे.

पुस्तकाचे नाव – कविता आली सामोरी
लेखक – किरण शिवहर डोंगरदिवे मोबा 7588565576
प्रकाशकअक्षर प्रकाशन आजरा
पृष्ठ – 96 किंमत – 100 रुपये

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

12 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

13 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

23 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 day ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

2 days ago