काय चाललयं अवतीभवती

अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सांगली – देशिंग हरोली ( ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील अग्रणी साहित्य प्रतिष्ठान मार्फत अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन अध्यक्ष कवी दयासागर बन्ने यांनी केले आहे. पुरस्काराचे हे २१ वे वर्ष आहे.

यंदा अग्रणी उत्कृष्ठ समग्र वाड्.मय पुरस्कार, अग्रणी उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार, अग्रणी उत्कृष्ठ कथासंग्रह पुरस्कार, अग्रणी उत्कृष्ठ युवा वाड्.मय पुरस्कार या चार प्रकारांमध्ये एक उत्कृष्ठ व एक विशेष असे दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल एका साहित्यिकास अग्रणी साहित्य साधना पुरस्कार दिला जातो.

यावर्षीच्या पुरस्कारासाठी १५ आॅगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकाच्या दोन प्रती , लेखकपरिचय व फोटोसह. ३० आॕगस्ट २०२३ पर्यंत पाठवावेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुस्तक , रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. पुरस्कारांचे वितरण नोव्हेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या २१ व्या अग्रणी साहित्य संमेलनामध्ये दिले जाणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्कः दयासागर बन्ने ९९६०७२४२७७

पुस्तके पाठवण्याचा पत्ताः

कवयित्री सौ. मनीषा पाटील (कार्यवाह, अग्रणी साहित्य प्रतिष्ठान, देशिंग हरोली)
मु.पोःदेशिंग-हरोली
ताः कवठेमहांकाळ
जिः सांगली
पिन कोडः४१६४१४

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

3 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

16 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago