Akkal kadha medicinal Plant
ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये अक्कल काढा या वनस्पतीबद्दल माहिती…
– सतिश कानवडे
संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल – 9850139011,9834884804
कॅपोझेटीव झुडुपवर्गीय कुळातील वार्षिक २५ ते ३० सेमी बुटकी व गुच्छासारखी वाढणारी झुपकेदार वनस्पती आहे. याच्या खोडावर व फांद्यांच्या कातडीवर अनेक गाठी असतात. पानांच्या कडांवर लहान लहान खाचा असतात. फुले गुच्छात येतात. या झाडाची मांसल फुले ७ ते १० सेमी लाल व 1 ते 1.५ सेमी जाड असतात. मधेच अधिक जाड व खालच्या व वरच्या बाजूस निमुळती असतात.
मुळांचा उपयोग औषधात केला जातो. मुळ्या तिखट, उष्णतावर्धक, कफ वात शामक आहे. वात विकारात तेलात चूर्ण मिसळून मालिश करावी. अक्कल काढा हा बलवर्धक, शुक्रजंतू वर्धक, कामशक्तीवर्धक, वातनाशक, दुख निवारक म्हणजे त्रिदोषनाशक आहे. मुळामध्ये सुगंधी तेल पाथरेथ्रीन हे मुलतत्व आहे. त्यामुळे दातदुखी असल्यास याच्या मुलाच्या काढ्याच्या गुळण्या कराव्यात.
ही वनस्पती समशीतोष्ण वातावरणामध्ये चांगली वाढते. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत हि वनस्पती चांगली वाढते. मध्यम व खोल जमीन या पिकासाठी चांगली असते.
बियापासून रोपे तयार करून लागवड करावी. नियमित हलकेच झारीने पाणी द्यावे. दहा दिवसानंतर बियाणाची उगवण दिसून येते. ५० ते ६० दिवसात रोपे लागवडीसाठी तयार होतात.
भरपूर प्रमाणात शेणखत व सेंद्रिय खते द्यावीत. रासायनिक खतांचा उपयोग करू नये.
अक्कलकाढा हे वार्षिक झुडुप आहे. फुले पक्व झाल्यावर पिवळसर व नंतर राखाडी रंगाची होतात. अशा वेळेस फुलांची देठविरहीत तोडणी करून सावलीत सुकवावी. फेब्रुवारी, मार्चमध्ये फुलांचा आकार लहान होण्यास सुरुवात होते. तेव्हा पाणी देणे बंद करून झाडे सुकू द्यावीत. अर्धवट सुकल्यावर पाणी देवून झाडे उपटून घ्यावी व सुकवून फुलांची प्रतवारी करावी.
हेक्टरी 6 ते १० क्विंटल उत्पादन मिळते. संपूर्ण झाडाचे ८ ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. सध्या फुलाचा दर ५०० ते १००० रुपये किलो व पंचाग १५ ते ४० रु. किलो असे आहे. चूर्ण ८०० ते १४०० रु. प्रतिकिलो जातो. लागवड व मजुरीचा खर्च उत्पन्नाच्या ५० टक्के आहे.
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…