अलवार माये आजकाल असचं होतं बघ मन सदा अलवार दाटून आलेल्या मेघागत.. कधीही झरतं आतल्या आत पापणीच्याही आत.. शिगोशिग पाणीच कधीही होतात ओले काठ... कुणाशी सहज बोललं तरी झरू लागतात डोळे अवचित मनही होत हळूवार... चष्मा आहे हे बरं नाही आजकाल असं हळवं होणं कुठं दिसतं साजरं... आपण बोलावं मनाच्या गाभ्यातलं तर समोरचा कोरडा ठक्क सिंमेटच्या भिंतीगत मन लिंपून बसलेला... अशावेळी आपणच हळवं मन झाकून होतो बेजार.. तसा तोही दुःख झाकून, चेहरा पालटून तर आला नसावा... म्हणूनच तुझ्या कुशीत फुटू लागतात मनाचे बांध,दुथडी वाहू लागते पाणीच पाणी उगाचचं मन हेलावतं आतल्या आत झरू लागतं... प्रतिमा इंगोले.९८५०११७९६९.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…