शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नाताळ सणा दरम्यान ढगाळ वातावरणाची शक्यता

सध्याचे धुके, पाऊस व पिकावर त्याचा परिणाम

प्रश्न – थंडी व तापमानाची स्थिती कशी आहे ?                               

माणिकराव खुळे – आज पासून पुढील चार दिवस म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबरपर्यन्त मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटे पाच चे किमान तापमान भागपरत्वे सध्या सरासरीपेक्षा १ ते ४ डिग्री से. ग्रेडने अधिक असल्यामुळे तेथे माफक थंडी जाणवत आहे. पण मुंबईसह कोकणात मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा १ ते २ डिग्री से. ग्रेडने खालावले असल्यामुळे मुंबईसह कोकणात, उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने तेथे अधिक थंडी जाणवत आहे.

प्रश्न – नाताळ सणादरम्यान पावसाची शक्यता आहे का ?

माणिकराव खुळे –  पश्चिमी प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून, नाताळ सणात म्हणजे २५ ते २९ डिसेंबर (बुधवार ते रविवार) पाच दिवसा दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात, भाग बदलत, ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही जाणवते.
             त्यातही गुरुवार दि. २६ ते शनिवार दि.२८ डिसेंबर पर्यंतच्या तीन दिवसात पावसाची ही शक्यता अधिक जाणवते. गहू, हरबऱ्या सारख्या पिकांना ह्या पावसाने लाभ होवु शकतो, असे वाटते. त्यामुळे ह्या पाच दिवसातील वातावरणातून, दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी ह्यावर्षी ढगाळ वातावरणामुळे अनुभवता येणार नाही, असे वाटते. मात्र वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार दि.३० डिसेंबर पासून  हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा करू या!

प्रश्न – सध्या सकाळी जाणवणारे धुके कश्यामुळे ?

माणिकराव खुळे –  सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीसमोर, दक्षिणोत्तर उभ्या लंबवर्तुळाकार समुद्री क्षेत्रात, समुद्रसपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत, अरबी समुद्रात, असलेल्या आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून,  दक्षिणी(दक्षिणेकडून उत्तरेकडे) वाहणाऱ्या वाऱ्यामुळे संपूर्ण कोकण, खान्देश, व नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व छत्रपती संभाजीनगर, जालना अश्या एकूण १९ जिल्ह्यात अरबी समुद्रावरून प्रचंड आर्द्रता लोटली जात आहे. त्यामुळे ह्या १९ जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबरपर्यन्त सकाळच्या वेळेस धुके पडण्याची शक्यता जाणवते.

प्रश्न – विदर्भात थंडीची स्थिती कशी असेल ?

माणिकराव खुळे – विदर्भासहित उर्वरित १७ जिल्ह्यात मात्र उत्तरी( उत्तरेकडून दक्षिणेकडे) वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यातून तेथे मात्र माफक थंडी जाणवणारच आहे, असे वाटते.
          
प्रश्न – धुक्याचा रब्बी पिकावर कसा परिणाम होईल ?

माणिकराव खुळे – कांदा, गहू, हरभरा पिकावर अळी, किडी, बुरशी, माव्याचे आक्रमण होते. किड व बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्याव्या लागतात. फुलोऱ्यातील पिकात परागीभवन व दाणाभरणीवर विपरित परिणाम होतो. प्रकाशसंश्लेषणा अभावी कमी अन्नद्रव्ये पुरवठ्यामुळे पिके कोमेजतात. त्यांच्या वाढीवर, शाखीय डाफळणीवर विपरित परिणाम होतो. द्राक्षांच्या घड तयार होत असतांना दमट हवामानाचा विपरीत परिणाम जाणवतो. त्यामुळे ह्या चार दिवसात शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे वाटते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

पन्नास वर्षे इतिहासाच्या सत्याचा शोध! गजानन मेहेंदळे यांच्या संशोधनतपस्येचा विलक्षण वारसा

१७ सप्टेंबर २०२६.प्रथम पुण्यस्मरण वर्षदिन.गजानन भास्कर मेहेंदळे: एक ऋषितुल्य इतिहास संशोधक ! https://www.youtube.com/embed/_djMeJxR9pg इतिहास केवळ…

5 hours ago

आकाशालाच माहीत असते त्याचा विस्तार; मग माणसाला स्वतःची ओळख कधी होते?

आपण स्वतःला इतरांच्या नजरेतून मोजत राहतो—यश, अपयश, मान, प्रतिष्ठा आणि परिस्थितीच्या तराजूत! पण आपल्या अस्तित्वाची…

6 hours ago

हातात येणारे पैसे आज आनंद देतील; पण उद्या त्याची किंमत कोण मोजणार?

रोख हस्तांतरण योजनांची मोठी राजकीय किंमत ! विशेष आर्थिक लेख देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये सत्तेवर…

20 hours ago

मराठी माणसाच्या अविनाशी उद्योग संस्कृतीचा स्वाभिमान बिंदू Book On PGP Prataprao Govindrao Pawar

उद्योग म्हणजे केवळ नफा, उलाढाल आणि मोठ्या आकड्यांचा खेळ नव्हे; माणसं घडवणारी कार्यसंस्कृती, मूल्यांशी तडजोड…

1 day ago

बहुध्रुवीय जगाची नांदी; भारताच्या नेतृत्वाखाली ब्रिक्सचा नवा अध्याय Brics summit 2026 India Multipolar World

बहुध्रुवीय जगाचा नवा अध्याय जागतिक राजकारणाची दिशा आता केवळ काही मोजक्या महासत्तांच्या निर्णयांवर ठरणार आहे…

1 day ago

गणेशाला जास्वंदाचे फूल का प्रिय ? आयुर्वेद सांगतो त्यामागचे गूढ… Ganesh Festival Special : Hibiscus flower

गणेशोत्सवात श्रीगणेशाला दुर्वांबरोबरच लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्याची परंपरा आहे. गणपतीच्या पूजेत लाल जास्वंदाला विशेष…

1 day ago