मध काढा पोळं तेथेच ठेवून मध माशांना हक्काचे घर द्या…

सांगली येथील वन विभाग व पुणे येथील बी बास्केट यांचेवतीने सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच मधमाश्या संवर्धन व बचाव याबाबत कार्यशाळा आयोजित केलेली होती. या कार्यशाळेमध्ये वन विभागाचे कर्मचारी सर्प मित्र वन्यजीव प्रेमी व वन कर्मचारी यांना शहरी व ग्रामीण भागातील मधमाशा संवर्धन या बाबत मार्गदर्शन करुन मधमाशाचे पेाळे कसे काढावे आणि पुन्हा ते पोळे त्याच जागी ठेवून हक्काचे घर देता येवू शकते किंवा त्यांचे पुन्हा पुर्नस्थापन करता येते असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.

मधमाशा हा निसर्गातील छोटासा घटक असून तो महत्त्वपूर्ण आहे. मधमाशाव्दारे परागीभवन होवून शेती उत्पन्न व फळ उत्पन्नात वाढ होणेस अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. आज अज्ञानापोटी अशी मधाचे पोळे जाळून तसेच किटकनाशके मारुन काढले जातात या मध्ये लाखो माशा मारल्या जातात. त्यामुळे जैवविविधता मधील एक घटक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मधमाशा ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण असा औषधी मध तयार करुन देतात. त्यामधून उत्पन्नाचे एक स्त्रोत निर्माण होते. यासाठी मधमाशी संवर्धन करणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करणे याबाबत कार्यशाळेतून संकल्प करण्यात आला आहे.

याबाबत जनतेने सहकार्य करावे असे सांगली वन विभागामार्फत आवाहन करणेत आले. या कार्यशाळेस उप वनसंरक्षक विजय माने, सहाय्यक वनसंरक्षक अजित साजणे, मधमाशी प्रशिक्षक संजय मारणे व बी बास्केटचे संचालक अमित गोडसे, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी आभार मानले. या कार्यशाळेस सांगली वन विभागातील कर्मचारी, सर्पमित्र व खरशींग सरपंच सुहास पाटील उपस्थित होते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

5 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

10 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

18 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

19 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago