शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

पुढील तीन दिवस म्हणजे सोमवार १७ ऑगस्ट पर्यन्त मुंबई सह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व छत्रपती संभाजी नगर अश्या २७ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.
             
दरम्यानच्या काळात, उर्वरित मराठवाडा आणि अहिल्यानगरसोलापूर अश्या ९ जिल्ह्यात मात्र केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

ह्या आठवड्यात मान्सूनची महाराष्ट्रात ही सक्रियता कश्यामुळे?

(i)मान्सूनी आस –
                  सध्या मान्सूनचा आसाचे पश्चिमे कडील टोक त्याच्या नेहमीच्या सरासरीजागे पेक्षा उत्तरेकडे तर पूर्वेकडील टोक दक्षिणेकडे वायव्य बं. उपसागरापर्यंत झुकलेले आहे.आज मान्सून चा आस समुद्र सपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यन्तच्या हवेच्या जाडीत, फिरोझपूर मुझफ्फरनगर बाराबंकी देहरी ह्या शहरावरून जात आहे.
तसेच
(ii) शिअर झोन –
              वाऱ्याचा उभा शिअर झोन ( म्हणजे एकमेकांविरुद्ध वाहणारे वारे ) महाराष्ट्राच्या साधारण २२ डिग्री उत्तर (म्हणजे साधारण नंदुरबार धुळे जळगांव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यांच्या वरून) अक्षवृत्तावर, समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किमी. उंच अश्या साडेचार किमी हवेच्या जाडीत पूर्व-पश्चिम पसरल्यामुळे व त्यातूनच त्या उंचीवर तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून मुंबई सह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर व छ. सं. नगर अश्या २७ जिल्ह्यात काहीशी मध्यम ते मुसळधार पावसाची
शक्यता निर्माण झाली आहे .त्यातही कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल.

(iii)अरबी समुद्रीय मान्सूनी पश्चिमी वाऱ्यांना मिळणारी बळकटी –

सध्या वायव्य बं उपसागरात तयार झालेले हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रातील वाहणाऱ्या पश्चिमी मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
                    

उर्वरित ऑगस्ट मध्ये पावसासाठी अनुकूल वातावरणीय प्रणालीची शक्यता जाणवते काय ?
             
वायव्य बंगाल उपसागरात तयार झालेले हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्र  जर दक्षिण-वायव्ये दिशेने मार्गस्थ झाल्यास ऑगस्ट च्या उर्वरित शेवटच्या दोन आठवड्यात, जुलै सारखीच महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण होवू शकते.अर्थात ह्याला जर-तर चे कंगोरे आहे. हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राचे मार्गक्रमण व तीव्रता बदलाच्या निरीक्षणांतीच ते ठरवता येईल.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: १७ ऑगस्ट पाऊसagriculture weatherArabian Sea MonsoonAugust RainAugust WeatherBay of BengalChhatrapati Sambhajinagar RainCyclonic CirculationFarmers Weather UpdateGhat Rainfallheavy rainIMD PUneIndia Meteorological DepartmentIye Marathichiye NagariKhandesh rainKhandesh weatherKolhapur rainKonkan rainKonkan weatherlow pressure areaMaharashtra agricultureMaharashtra farmersMaharashtra monsoonMaharashtra rainMaharashtra Rain AlertMaharashtra Rain NewsMaharashtra weatherManikrao KhuleMarathwada weathermoderate rainMonsoon 2026monsoon activitymonsoon forecastMonsoon SystemMonsoon TroughMumbai rainMumbai weatherNashik rainPune rainPune weatherrain forecastrain predictionRain Updaterainfall forecastSangli rainSatara rainsouthwest monsoonVidarbha rainVidarbha weatherWeather ExpertWeather forecastWind Shear Zoneअरबी समुद्रइये मराठीचिये नगरीऑगस्ट पाऊसऑगस्ट हवामानकमी दाबाचे क्षेत्रकोकण पाऊसकोकण हवामानकोल्हापूर पाऊसखान्देश पाऊसखान्देश हवामानघाटमाथा पाऊसचक्रीय वाऱ्याची स्थितीछत्रपती संभाजीनगर पाऊसनाशिक पाऊसपर्जन्यमान अंदाजपाऊस शेतीपाणी शेतीपावसाचा अंदाजपावसाचा अंदाज महाराष्ट्रपावसाची शक्यतापावसाचे पूर्वानुमानपुणे पाऊसपुणे हवामानबंगालचा उपसागरमध्यम पाऊसमराठवाडा हवामानमहाराष्ट्र पाऊसमहाराष्ट्र पाऊस बातमीमहाराष्ट्र मान्सूनमहाराष्ट्र हवामान बातम्यामान्सून २०२६मान्सून अपडेटमान्सून सक्रियतामान्सूनी आसमुंबई पाऊसमुंबई हवामानमुसळधार पाऊसमुसळधार पावसाचा अंदाजवाऱ्याचा शिअरविदर्भ पाऊसविदर्भ हवामानशिअर झोनशेतकरी हवामान अंदाजशेतकऱ्यांसाठी हवामानशेती हवामानसांगली पाऊससातारा पाऊसहवामान अंदाजहवामान अपडेटहवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे

Recent Posts

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 hour ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

15 hours ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

1 day ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

1 day ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

2 days ago

जीडीपी वाढतोय, मग आनंद कुठे हरवतोय ? Happiness GDP And Human-Development

आनंदाची 'जीडीपी' आणि आपण ! दरवर्षी मार्च महिन्यात 'जागतिक आनंद अहवाल' जाहीर होतो,काही देश अव्वल…

2 days ago