fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 18, 2026
Home » राज्यात तीन वर्षांसाठी मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राज्यात तीन वर्षांसाठी मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती

List of honorary wildlife wardens appointed by Maharashtra government for wildlife protection

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून ही नियुक्ती करण्यात आली असून ती पुढील तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे, अशी माहिती महसूल व वन विभागाचे विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांनी दिली आहे.

शासन निर्णयानुसार अमरावती, अकोला, बुलढाणा, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, पुणे, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीत डॉ. सावन देशमुख, निलू सोनी, अमोल सावंत, डॉ. वैशाली निकम, लुकेश उर्फ अजय कुकडकर, डॉ. रमझान विराणी, वैष्णवी मसके, आकाश आहाळे, निचकेत उतपट, आदित्य परांजपे, भरत छेडा, जयप्रकाश पठाडे, वैभवी तोडकर, विकास मस्के, देवेंद्र भोसले, रोहन भाटे, संजय सावंत, विशाल पाटील, प्रतीक मोरे, उमाकांत पाटील, संजय वानखेडे, राजेश ठोंबरे आदींचा समावेश आहे.

नियुक्त मानद वन्यजीव रक्षकांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या व अधिकार हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 तसेच केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या नियुक्त्यांमुळे राज्यातील वन्यजीव संरक्षण कार्याला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तीन वर्षांसाठी विविध जिल्ह्यांतील नियुक्त्या अशा…

अमरावती 1) डॉ. सावन माणिकराव देशमुख 2) श्रीमती निलु सोनी
अकोला 1) अमोल जयराम साांवत 2) मिलींद विष्णुपंत शिरभाते
बुलढाणा 1) सचिन रामदास कापूरे 2) डॉ. वैशाली गजेंद्र निकम
गडचिरोली 1) लुकेश ऊर्फ अजय पितांबर कुकडकर 2) मिलिंद मधुकर उमरे
यवतमाळ 1) डॉ. रमझान सद्रुभाई विराणी 2) कु. वैष्णवी सुभाष मस्के
वाशिम 1) आकाश अशोक आहाळे
पुणे 1) नचिकेत यशवंत उतपट 2) गायत्री नचिकेत आवाधनी 3) आदित्य परांजपे
सोलापूर 1) भरत चुनीलाल छेडा
नाशिक 1) जयप्रकाश रंगनाथ पठाडे 2) वैभवी राजेंद्र तोडकर
अहिल्यानगर 1) विकास मच्छिंद्र मस्के 2) सावित्रि अनिल शेवते
कोल्हापूर 1) देवेंद्र भोसले 2) श्रीमती पुजा अमोल हाळवणकर 3) यशपाल सुतार
सातारा 1) रोहन मधुकर भाटे 2) गायत्री नितीन पवार 3) सुनिल भोईटे
सिंधुदुर्ग 1) संजय सावंत 2) भाग्यश्री कृष्णा परब
सांगली 1) विशाल विरसेन पाटील 2) कांचन पुंडलिक सुतार
रत्नागिरी 1) प्रतिक शाांताराम मोरे 2) सोनाली मनोज मेस्त्री
धुळे 1) उमाकाांत अरुण पाटील
नंदुरबार 1) संजय नाना वानखेडे
जळगाव 1) राजेश दत्तात्रय ठोंबरे

Related posts

भारत – तैवान यांच्या दरम्यान सेंद्रीय उत्पादनांसाठी परस्पर मान्यता करार

गंगा नदीचे शुद्धीकरण हवे, सुशोभिकरण नव्हे…

शेतीक्षेत्रात उदारीकरण आले नसल्याने नुकसान

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!