काय चाललयं अवतीभवती

सातारा येथील डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सातारा – येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या काळात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथातील दोन ग्रंथाना ‘ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण’ आणि ‘ सौ सुमन चव्हाण’ उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जाणार आहेत. तरी या स्पर्धेसाठी इच्छुक लेखकांनी पुस्तके पाठवावीत असे आवाहन ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.

ग्रंथमित्र डॉ. चव्हाण यांनी महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीला योग्य दिशा दिली होती. तसेच सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे व ग्रंथालय चळवळीचे ते मार्गदर्शक होते. सातारा येथे भरणाऱ्या जिल्हा ग्रंथमहोत्सवाचे ते संस्थापक अध्यक्ष व प्रेरणास्थान होते. यासाठी त्यांच्या स्मरणार्थ तसेच त्यांच्या पत्नी सुमन चव्हाण यांच्या स्मरणार्थ गेली पंधरा वर्षे हे साहित्य पुरस्कार दिले जातात. तरी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील इच्छुक लेखकांनी 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ग्रंथांच्या दोन प्रती 20 जानेवारी 2026 पर्यंत पाठवाव्यात. दोन उत्कृष्ट ग्रंथाना प्रत्येकी 2500 रुपये रोख बक्षीस दिले जाते. कोणत्याही साहित्य प्रकारातील स्वलिखित अथवा अनुवादित पुस्तके पुरस्कारासाठी ग्राह्य धरली जातात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सुनिता कदम – 9822112155, डॉ. राजेंद्र माने 8975981321, प्रा. प्रमोदिनी मंडपे – 8600101063, डॉ. सौ. सुनीता उत्तेकर – 9422401704, डॉ. वैशाली चव्हाण – 98239 86280 यांच्याशी संपर्क साधावा.

पुस्तक पाठवण्यासाठी पत्ता :
ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय
C/O डॉ. अनिमिष शिवाजीराव चव्हाण,
मैत्र क्लिनिक
रुक्मिणी कुंज, सावकार रोड, गुरुवार पेठ,
सातारा – 415002

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

12 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

17 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago