काय चाललयं अवतीभवती

डॉ. सुनील सावंत यांना काव्य गौरव पुरस्कार जाहीर

मुंबई – ठाणे येथील श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांना काव्य गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. साहित्य क्षेत्रातील कविता प्रांतातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या ४१ व्या वर्धापन दिनी ( १० एप्रिल ) सायंकाळी सात वाजता रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई येथे होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

सन २००७ मध्ये डॉ. सुनील सावंत यांच्या मराठी पाच काव्य संग्रहांवर आधारित डॉ. सुनील सावंत: कवी आणि कविता (समीक्षक : शामल वेचलेकर व बाळ राणे ) या समीक्षा ग्रंथाची निवड अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन येथे संदर्भ ग्रंथ म्हणून केली होती. त्या ग्रंथात डॉ. सुनील सावंत यांच्या “ज्वालामुखी, माझी वस्ती मी शोधतोय, मैत्रीण, स्वातंत्र्याची हाक व सूर्य दिसत राहील तोपर्यंत…” ह्या पाच काव्य संग्रहातील कवितांची समीक्षा आहे. दरवर्षी विविध भाषेतील ग्रंथांमधून संदर्भ ग्रंथ अमेरिकेतील लायब्ररीत निवडले जातात. २००७ मध्ये हा आंतरराष्ट्रीय सन्मान डॉ. सावंत यांना मिळाला आहे.

डॉ. सावंत यांची मराठी, हिंदी व इंग्लिश भाषेत एकूण २१ पुस्तके आजपर्यंत प्रकाशित असून त्यात ५ मराठी काव्य संग्रह, २ मराठी कथा संग्रह, १ मराठी अनुवादित ललित लेख संग्रह, १ मराठी आध्यात्मिक पुस्तक, ४ मराठी संपादित काव्यसंग्रह, १ मराठी संपादित चरित्रात्मक पुस्तक, त्यांच्या ५ काव्य संग्रहातील मराठी कवितांवर आधारित १ समीक्षा ग्रंथ, १ मराठी अनुवादित आध्यात्मिक ग्रंथ, १ हिंदी काव्य संग्रह, १ हिंदी आध्यात्मिक पुस्तक, १ हिंदी शोध ग्रंथ, १ इंग्लिश संपादित ललित पुस्तक व १ मराठी कादंबरीचा इंग्लिश भावानुवाद अशी पुस्तके प्रकाशित आहेत.

नोव्हेंबर २४ मध्ये त्यांच्या सूर्य दिसत राहील तोपर्यंत… या काव्य संग्रहाची तिसरी आवृत्ती डॉ. भालचंद्र मुणगेकर ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 hour ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

6 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

14 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

15 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

24 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago