शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पपई फळपिकामधील कार्यक्षम अन्नद्रव्ये नियोजन

🥑 पपई फळपिकामधील कार्यक्षम अन्नद्रव्ये नियोजन 🥑

केळी फळपिकानंतर सर्वात जास्त उत्पाद्कीय क्षमता असलेल्या पपई पिकाची लागवड आपल्या संपूर्ण राज्यात होते. सर्वसधारणपणे जुन-जुलै, फेब्रुवारी – मार्च, तसेच ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यामध्ये पपई लागवड केली जाते.

🖋 डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर (पीएचडी फळशास्त्र)
संस्थापक-अध्यक्ष, कृषिसमर्पण फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य

पपई लागवडीसाठी रोप तयार करुन ४० ते ४५ दिवसांचे रोप लागवडीसाठी वापरले जाते. पपई शेतीत अन्नद्रव्ये व्यवस्थापनाला विशेष महत्त्व दिले आहे. आपल्या भागात उपलब्ध असणाऱ्या सर्व संकरीत जाती आपल्या १६-१८ महिन्यांच्या कालावधीमध्ये अन्नद्रव्यांना उत्तम प्रतिसाद देतात.

पपईच्या विक्रमी उत्पादनासाठी १ ते २ वेळा खत देण्याऐवजी एकूण खतांची मात्रा विभागून वेगवेगळ्या पीक अवस्थेमध्ये देणे आवश्यक असते. यामध्ये रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक असते. योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी, अधिक उत्पन्नाकरिता लागवडीअगोदर माती परिक्षण करून घेणे आवश्यक आहे. जमिनीच्या दर्जा पाहून सेंद्रिय खतमात्रा वापरणे जरुरीचे आहे. योग्य अन्नद्रव्ये नियोजनामुळे जमिनीचा पोत सुधारतो, निचरा उत्तम राहतो आणि जमिनीची पाणीधारणक्षमता वाढते, परिणामी विक्रमी उत्पादन मिळते.

सेंद्रिय खते –

मध्यम खोल साधारण जमीन असल्यास पूर्व मशागतीवेळी एकरी २५-३० बैलगाड्या गावखत आणि गाळ जमिनीत टाकावा. भारी व खोल जमीन असल्यास पूर्व मशागतीवेळी एकरी १५-२० बैलगाड्या गावखत व गाळ जमिनीत टाकावा. गावखत उपलब्ध नसेल तर शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे. मात्र हे खत उत्तम कुजलेले असावे, त्यात न कुजणाऱ्या वस्तूंचा समावेश नसावा.

रासायनिक खते –

पूर्व मशागतीच्या वेळी गावखत व तलावातील गाळ टाकल्यानंतर; लागवडीनंतर ५० ग्रॅम प्रति झाड १०:२६:२६ द्यावे. त्यानंतर खालीलप्रमाणे रासायनिक खतांचा वापर करावा:
लागवडीनंतर १ महिन्याने- १०० ग्रॅम १०:२६:२६, लागवडीनंतर २ महिन्याने- २०० ग्रॅम एम. ओ. पी., लागवडीनंतर ३ महिन्याने- २५० ग्रॅम डी. ए. पी., लागवडीनंतर ४ महिन्याने- २५० ग्रॅम डी. ए. पी., लागवडीनंतर ५ महिन्याने- २५० ग्रॅम डी. ए. पी. , लागवडीनंतर ६ महिन्याने – २५० ग्रॅम १९:१९:१९, लागवडीनंतर ७ महिन्याने- २५० ग्रॅम १९:१९:१९, लागवडीनंतर ७ महिन्याने- २०० ग्रॅम एम. ओ. पी.

शेणकाला रबडी –

या खतांशिवाय शेणकाला रबडी वापरली तर दर्जेदार व वजनदार फळे मिळतात. केवळ रबडीमुळे झाडांना सुक्ष्य अन्नद्रव्ये देणे शक्य होते. रबडी दिल्याने झाडांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात उपयुक्त जीवाणू मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यांच्या कार्यामुळे झाडांना नत्र, स्फुरद व पालाश अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतात. रबडी वापरामुळे दर एकरी ८० ते ८५ टन उत्पादन मिळालेली उदाहरणे आहेत.

रबडी तयार करण्यासाठी १०० किलो शेण ४०० लिटर पाण्यात भिजत घालावे. शेणाबरोबरच १० किलो फेरस सल्फेट, १० किलो मेंग्नीशियम सल्फेट व १० किलो बोराक्स मिसळावे. हे मिश्रण काठीने हलवून चांगले एकजीवी करावे. २४ तासंनातर पुन्हा ते काठीने हलवावे. हि रबडी वापरताना यात पुन्हा ६०० लिटर पाणी मिसळून ते एकजीवी करून २४ तास ठेवून मग वापरावे. या प्रक्रियेत सर्व सुक्ष्य अन्नद्रव्ये पाण्यात विरघळतात.

हे मिश्रण दर झाडी एक लिटर दर महा किमान सात वेळा दिल्यास परिणाम दिसून येतो. ठिबकाच्या खाली रेख पद्धतीचा वापर करून रबडी देण्यात यावी. रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर रबडीचा वापर करावा. रबडी मिश्रण दिल्याने पाने गर्द हिरवी होतात; पिवळी दिसत नाहीत. झाडाची जोमदार वाढ होते तसेच फळांची संख्या आणि फळांचे वजन वाढते. फळातील पोकळी कमी होऊन गर वाढतो.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

4 hours ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

23 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

2 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago