लसूण लागवड करण्यासाठी प्रथम शेताची नांगरणी करून व कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. वाफे तयार करण्यापूर्वी एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ३ टन कोंबडी खत किंवा ३ टन गांडूळ खत पसरून जमिनीत चांगले मिसळावे.

ट्रॅक्टरला जोडता येणाऱ्या सरीयंत्राने १२० सें.मी. रुंद, ४०-६० मीटर लांब आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये ४५ सें.मी. अंतर ठेवावे. रुंद गादीवाफ्यांची पद्धत ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता सोयीची आहे.

ठिबक सिंचनासाठी प्रत्येक गादीवाफ्यामध्ये इनलाईन ड्रिपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या दोन लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रिपरमध्ये ३०-५० सें.मी. अंतर असावे. तसेच त्याची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी.

तुषार सिंचनासाठी लॅटरलमध्ये (२० मि.मी.) ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावे.

लागवडीकरीता १.५ ग्रॅम वजनाच्या पाकळ्या निवडाव्यात. लहान, पोचट, रोगट लसूण कळ्या निवडू नयेत. बुरशीजन्य रोग व फुलकिडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, कार्बेंडाझीम १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणात लसूण पाकळ्या दोन तास बुडवून नंतर लागवड करावी.

लसूण पाकळ्या टोकण पद्धतीने १५ x १० सें.मी. अंतरावर व २ सें.मी. खोलीवर उभ्या लावाव्यात. एकरी १६० ते २०० किलो कळ्या लागतात. लागवडीपूर्वी किंवा लागवडीवेळी ऑक्‍सिफ्लोरफेन (२३.५ ईसी) २ मि.लि. किंवा पेंडीमिथेलीन (३० ईसी) ४ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात तणनाशकांचा वापर करावा.

(सौजन्य – कृषक कृषी सल्ला)

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

2 hours ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

1 day ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

1 day ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

2 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

2 days ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

3 days ago