शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अल्पभुधारक शेतकऱ्यांनी फायदेशीर शेती कशी करावी ? कृषी मंत्र्यांना शेतकरी संघटनांचा सवाल

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी आणि शेतकरी संघटनांसोबत संवादाचा भाग म्हणून शेतकरी आणि शेतकरी संघटनांसोबत केली चर्चा

नवी दिल्ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत शेतकरी, शेतकरी संघटना आणि त्यांचे सदस्य आणि विविध राज्यांतील प्रतिनिधींशी चर्चा केली.

चौहान म्हणाले की, शेतीशी संबंधित अनेक प्रश्नांवर शेतकऱ्यांशी गांभीर्याने चर्चा करण्यात आली. रब्बी पिकांचा एमएसपी वाढवण्याच्या कालच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी संघटनांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून अनेक विधायक सूचना दिल्या. शेतकरी संघटनांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या.

आदर्श शेती करावी, ज्यामध्ये एक, दोन किंवा अडीच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी शेती कशी करावी आणि ती फायदेशीर कशी करता येईल याची माहिती द्यावी, अशी सूचना शेतकऱ्यांनी केली.

पाणी उपलब्ध करून देणे, खतांचा वापर, मृदेच्या आरोग्यात सुधारणा करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, साखर कारखाने बंद पडणे, भटक्या जनावरांच्या समस्या आदींबाबत शेतकऱ्यांनी चर्चा केली. भरडधान्य /श्री अन्न यांना प्रोत्साहन देण्याबाबतही शेतकऱ्यांनी सूचना केल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले. राज्य सरकारशी संबंधित विषय राज्यांकडे पाठवले जातील आणि केंद्र सरकारच्या विषयांवर विभाग कारवाई करतील. शेतकऱ्यांशी संवाद अतिशय उपयुक्त असून या संवादातून थेट शेतकऱ्यांकडून मूलभूत समस्यांची माहिती मिळत आहे. शासनाच्या योजनाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शिवाजी विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू Shivaji University Modi Script Certificate Course Admission Process Begins

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर…

7 hours ago

आत्मज्ञान म्हणजे स्वतःचा झालेला नवा जन्म Self-Knowledge Means a New Birth of the Self | Dnyaneshwari

माणसाचा जन्म एकदा देहाचा होतो; पण स्वतःची खरी ओळख पटते, तो त्याचा खरा जन्म असतो.…

20 hours ago

जीडीपीचे सत्य: आकड्यांचा खेळ आणि वास्तव GDP growth in India

GDPच्या वाढीचे आकडे समोर आले की राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण येते. कुणाच्या मते भारतीय अर्थव्यवस्था १०…

22 hours ago

सगळे कुठे आहेत? आकाशातील या प्रश्नातून सुरू होते एका अनंत अंतराळयात्रेची कहाणी!

रात्रीच्या आकाशात चमकणारा प्रत्येक तारा आपल्याला एक नवा प्रश्न विचारतो. या अथांग विश्वात असंख्य तारे,…

1 day ago

आवाज त्यांचा, कला त्यांची; मग इतिहासानं त्यांना विसरलं का?

ज्यांनी ठुमरी, दादरा, गझल, चैती, होरी-कजरीसारख्या कलांना आपल्या स्वरांनी समृद्ध केलं, ज्यांच्या कोठ्यांवर संगीताची साधना…

1 day ago

AI चा वर्षाव, भावनांचा दुष्काळ; मन पुन्हा हिरवं होईल का?

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वर्षाव होत असताना मानवी भावनांचा दुष्काळ का जाणवतो आहे? तंत्रज्ञानाने आयुष्य अधिक सोयीचे…

2 days ago