काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

वडशिवणे ता. करमाळा, जि. सोलापूर येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींना गावगाडा साहित्य पुरस्कार दिला जातो. २०२३ च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष सोमनाथ टकले यांनी दिली.

पुरस्काराचे १३ वे वर्ष असून २०२३ चे विजेते असे –

गावगाडा साहित्य पुरस्कार तान्हाजी बोऱ्हाडे (पुणे ) यांच्या जळताना भुई पायतळी या काव्यसंग्रहास देण्यात आला आहे. मातोश्री चांगुणाबाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कार डॉ. दयासागर बन्ने ( सांगली ) यांच्या समकालीन साहित्या स्वाद ‘ या समिक्षाग्रंथास व प्रा. रामचंद्र इकारे (बार्शी ) यांच्या माणुसकीचं आभाळ या काव्यसंग्रहास देण्यात आला आहे.

मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृति पुरस्कार गणपत जाधव (अकलूज) यांच्या हावळा या कथासंग्रहास देण्यात आला आहे. मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार नागू वीरकर ( सातारा ) यांच्या हेडाम या कादंबरीस व मानसी चिटणीस (पुणे ) यांच्या माझ्यातल्या बुद्धाचा शोध’ या काव्यसंग्रहास देण्यात आला आहे.

गावगाडा इतिहास संशोधन पुरस्कार सरला भिरुड ( पुणे ) यांच्या ‘उत्तर दक्षिणचे प्रवेशद्वार बऱ्हाणपुर’ या संशोधनास देण्यात आला आहे. गावगाडा कलारत्न पुरस्कार सुहास सुतार ( वैराग ) यांना शिल्पकलेसाठी तर गावगाडा प्रबोधन साहित्य पुरस्कार दिनेश आदलिंग (बारामती) यांना देण्यात आला आहे.

पुरस्कार संयोजन समितीमध्ये अध्यक्ष सोमनाथ टकले, प्रा बाबुराव इंगळे, डॉ जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ, डॉ प्रा संजय चौधरी, प्रज्ञा दीक्षित, डॉ. प्रा. संतोष साळुंखे, डॉ. प्रा मच्छिंद्र नांगरे, हरिश्चंद्र साळुंखे, सखाराम राऊत गुरुजी, रेवननाथ टकले यांचा समावेश आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

11 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

24 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago