How can lotuses grow Poem by Shripad Bhalchandra Joshi
किती करणार
आहात
परस्परांवर
चिखलफेक
चिखलच
संपून गेला तर
कमळं तरी उगवतील
कशी ?
ती उगवलीच
नाही तर कोणाला
कोणी अर्पण
करणार कशी ?
अर्पणाऐवजी
तर्पणाचीच
येईल ना
वेळ
चिखलफेक
करणाऱ्यांसाठीही
चिखल
उरणारच नाही
मग
तुमच्याकडे
कुणी ढुंकूनही
बघणारच नाही
तुम्हा लोकांच्याच
या रोजगाराचे
मग
काय होईल ?
बाकी तर काही येतच नाही ना तुम्हाला
नंतर ठेवणार मग
कोण कुठे कामाला ?
श्रीपाद भालचंद्र जोशी
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…
फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…
https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…
शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…
राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…