शेती पर्यावरण ग्रामीण विकास

2025 मध्ये सरासरीपेक्षा जास्त नैऋत्य मोसमी पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली – भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील भारतीय हवामान विभागाने 2025 साठी नैऋत्य मोसमी (जून ते सप्टेंबर) पावसाचा तसेच प्रत्येक महिन्यातील पावसाचा व तापमानाचा सुधारित अंदाज प्रकाशित केला आहे. या अंदाजानुसार, देशभरात मिळून दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) 106 टक्के मोसमी पाऊस पडेल. यामध्ये 4 टक्के कमीअधिक होण्याची शक्यता आहे. मान्सून हंगामातील सरासरीपेक्षा जास्त पावसाचीच शक्यता दर्शविणारे हे प्रमाण आहे. 

साधारणपणे मध्य भारतात आणि दक्षिण द्वीपकल्प भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल तर वायव्य भारतात सरासरीइतका (एलपीएच्या 92 ते 108 टक्के) पाऊस पडेल. ईशान्य भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी (एलपीएच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी) पावसाची शक्यता आहे. भारतातील पावसावर शेती अवलंबून असणाऱ्या मोसमी पावसाच्या क्षेत्रातदेखील सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून हे खरीपातील शेतीसाठी फायदेशीर आहे.  

जून ते सप्टेंबर 2025 या काळात देशाच्या बहुतांश भागात सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. मात्र वायव्य आणि पूर्व भारतात तसेच ईशान्य भारतातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.

विशेषत्वाने जून 2025 मध्ये देशभरात सरासरीपेक्षा जास्त (एलपीएच्या 108 टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडेल. बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असला तरी द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील भागात आणि वायव्य व ईशान्य भारतातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभाग शेतीच्या नियोजनासाठी, जलस्रोतांच्या व्यवस्थापनात आणि आपत्ती व्यवस्थापन सज्जतेत मदत व्हावी यादृष्टीने हवामानाच्या अंदाजावर सातत्याने लक्ष ठेवून त्यात सुधारणा करेल. यापुढील हवामानविषयक अंदाज व सविस्तर अहवाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

4 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

12 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

13 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

22 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

23 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

2 days ago