Invitation to send poems for Kavikattaya in Marathi Sahitya Sammelan
पुणे – दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टामध्ये कविता सादरीकरणासाठी आवाहन करण्यात आले आहे. कवींनी त्यांच्या स्वरचित कविता ३० नोव्हेबरपर्यंत पाठवाव्यात, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. उषा तांबे व सदस्य राजन लाखे यांनी दिली आहे.
दिल्ली येथे २१, २२, २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात ‘कविकट्टा’ या व्यासपीठावर कवींना कविता सादर करण्याची संधी देण्यात येते. यासाठी एक स्वरचित कविता संयोजकांच्यावतीने मागवण्यात येत आहे. ही कविता २० ओळींपेक्षा मोठी नसावी. कविता स्वरचित असावी. गझलसहित कवितेचे सर्व प्रकार यामध्ये समाविष्ट असतील. ही कविता युनिकोडमध्ये kavikattadelhi98@sarhad.in या ईमेलवर पाठवावी. तसेच कवितेखाली स्वतःचे नाव, गाव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक (व्हॉटस्अॅप) लिहावा. एकापेक्षा जास्त कविता पाठवल्यास सर्वच कविता बाद ठरविण्यात येईल. याची नोंद घ्यावी. कविता पोस्टाने पाठवताना ती टाईप केलेली असावी. पाकिटावर ‘कविकट्टा दिल्ली’ असा स्पष्ट उल्लेख करावा. निवड झालेल्या कवींना दिल्ली येथे सादरीकरणानंतर प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येते. ११) कविता स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
कविता पोस्टाने पाठविण्याच पत्ता :
गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनी, सरहद पब्लिक स्कूल, स. नं. ६, धनकवडी, पुणे ४११०४३.
गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…
स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…
कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…
एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…
पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…
धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…