May 7, 2026
Invitation to send poems for Kavikattaya in Marathi Sahitya Sammelan
Home » मराठी साहित्य संमेलनातील कविकट्ट्यासाठी कविता पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

मराठी साहित्य संमेलनातील कविकट्ट्यासाठी कविता पाठविण्याचे आवाहन

पुणे – दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टामध्ये कविता सादरीकरणासाठी आवाहन करण्यात आले आहे. कवींनी त्यांच्या स्वरचित कविता ३० नोव्हेबरपर्यंत पाठवाव्यात, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. उषा तांबे व सदस्य राजन लाखे यांनी दिली आहे.

दिल्ली येथे २१, २२, २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात ‘कविकट्टा’ या व्यासपीठावर कवींना कविता सादर करण्याची संधी देण्यात येते. यासाठी एक स्वरचित कविता संयोजकांच्यावतीने मागवण्यात येत आहे. ही कविता २० ओळींपेक्षा मोठी नसावी. कविता स्वरचित असावी. गझलसहित कवितेचे सर्व प्रकार यामध्ये समाविष्ट असतील. ही कविता युनिकोडमध्ये kavikattadelhi98@sarhad.in या ईमेलवर पाठवावी. तसेच कवितेखाली स्वतःचे नाव, गाव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक (व्हॉटस्अॅप) लिहावा. एकापेक्षा जास्त कविता पाठवल्यास सर्वच कविता बाद ठरविण्यात येईल. याची नोंद घ्यावी. कविता पोस्टाने पाठवताना ती टाईप केलेली असावी. पाकिटावर ‘कविकट्टा दिल्ली’ असा स्पष्ट उल्लेख करावा. निवड झालेल्या कवींना दिल्ली येथे सादरीकरणानंतर प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येते. ११) कविता स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

कविता पोस्टाने पाठविण्याच पत्ता :
गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनी, सरहद पब्लिक स्कूल, स. नं. ६, धनकवडी, पुणे ४११०४३.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठात ३ फेब्रुवारीला शिल्पकला कार्यशाळा

अक्षरबंध फाउंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!