काय चाललयं अवतीभवती

कराडच्या शब्दशिल्प वाड्.मय पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचे आवाहन

कराड – प्रती वर्षाप्रमाणे ह्या वर्षीही मातुश्री स्व. सौ. वत्सलामाई बोबडे व पिताश्री स्व. वामनराव बोबडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार योजनेचे आयोजन शब्दशिल्प वाड्.मय प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

२०२६ च्या या योजनेसाठी कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र, काव्यसंग्रह, ललित, समीक्षा,संपादन अशा वैशिष्ट्यदर्शी वाड्मय प्रकारातील साहित्य मागविण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रत्येक वाड्मय प्रकारासाठी आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ ह्या कालावधीत प्रकाशित झालेले ग्रंथ ग्राह्य धरण्यात येणार आहे. तरी ३० जून २०२६ पर्यंत ग्रंथाच्या २ प्रती, अल्पपरिचयासह पाठवावेत असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

पुरस्कारसाठी ग्रंथ पाठवण्याचा पत्ताः
प्रा. (डॉ.) सुहासकुमार बोबडे,
समन्वयक शब्दशिल्प वाड्मय प्रतिष्ठान, कराड
“शब्दशिल्प” अ/२७,रुक्मिणी गार्डन भाग २
कराड ४१५११० जि. सातारा
संपर्क क्र.९४०३३४५३५१

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

15 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

20 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago