ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये आवळा या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पतीआरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804

वनस्पतीचे नाव- आवळा

वनस्पतीचे वर्णन

युफोरबियेशी या वनस्पती कुळातील हा वृक्ष असून याच्या बहुरंगी गुणामुळे हा वृक्ष आयुर्वेदामध्ये फार लोकप्रिय आहे. हा वृक्ष ९ ते १२ मीटर उंच वाढतो. आवळा हे कोरडवाहू फळझाड अत्यंत काटक असून महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे वाढते.

औषधी उपयोग

या वृक्षाच्या सालीचा ताजा रस+हळद+मध ग्र्मिव्र वापरतात. फळे रात्रभर पाण्यात ठेवून पाण्याने डोळे धुवावे. त्रिफळा चूर्ण (हरडा+बेहडा+आवळा) तयार करतात. थंडी, पडसे, रक्तशुद्धीकरीता, छातीचे विकार बरे होण्यासाठी उपयोगी. थकवा घालवण्यासाठी आवळा + पिवळी+ पळसखार+ मध+ तूप एकत्र करून रोज प्यावे. ताप, आमांश, कावीळ, प्रमेह, आम्लपित्त, हगवण व मधुमेहावर उपयुक्त. मोठ्या प्रमाणावर च्यवनप्राश बनविण्यासाठी वापर. माणसाचे आयुष्य वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

हवामान व जमीन

फळ धारणेसाठी उबदार उष्ण व समशीतोष्ण हवामानाची आवश्यकता असते. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगली वाढ होते.

रोपे तयार करणे

बिया किंवा कलमाद्वारे याची रोपे तयार करता येतात. बिया वाळून चोविस तास थंड पाण्यात भिजवून गादी वाफ्यावर पेरणी करावी. रोपे पिशवीत लावावीत.

लागवड

रोपाची ७ बाय ७ मीटर अंतरावर लागवड करावी. त्यासाठी ३० बाय ३० बाय ३० सेमी आकाराचे खड्डे घेवून त्या मातीमध्ये २५ ग्रॅम स्फुरद, १० किलो पालाश, चांगले शेणखत आणि मिथेन मिसळून खडी भरून घ्यावे. पिशवीतील रोपांचा उपयोग करावा.

खते व पाणी व्यवस्थापन-

 जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यावे. झाडाच्या वयानुसार खतांची मात्रा वाढवावी. एका झाडाला पाच किलो शेणखत ५० ग्रॅम मिश्रण. नत्र खताची मात्रा दरवर्षी थोडी थोडी वाढवावी.

काढणी

फळ धारणेपासून १८ ते २० आठवड्यात फळाची पूर्ण वाढ होते.

उत्पन्न

साधारणपणे १० वर्षाच्या झाडाला ५० ते १५० किलो आवळा मिळतो.

बाजारभाव

स्थानिक बाजारपेठेत आवळ्याला ३० ते ४० रुपये प्रतिकिलो आणि चूर्ण २५ रुपये प्रतिकिलो दर मिळतो.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

9 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

14 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

23 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

23 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago