काय चाललयं अवतीभवती

‘साहित्यकणा’ संस्थेला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे दोन लाखाचे अनुदान

नाशिक : साहित्यकणा फाउंडेशनतर्फे ९ फेब्रुवारीला होणाऱ्या अकराव्या एकदिवसीय भव्य राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्य साहित्यसंस्कृती मंडळाचे दोन लाखाचे अनुदान मिळाले असल्याची माहिती साहित्यकणा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय द. गोराडे यांनी दिली आहे.

गेली दहा वर्षापासून साहित्यकणा फाउंडेशन संस्था लोक सहभागातून साहित्य संमेलन घेत आली आहे, यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे दोन लाखाचे अनुदान मिळाले आहे, त्यामुळे साहित्यकणा फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यावतीने संमेलन घेणार असल्याचे अध्यक्षांनी सागितले. ते पुढे म्हणाले की, साहित्यकणा संस्था भाषा वाढीसाठी करत असलेले प्रयत्न व पारदर्शक व्यवहार यामुळे मंडळाचे अनुदान मिळाले आहे.

डोंगरे वसतिगृहाजवळ समर्थ मंगल कार्यालय, कॅनडा कॉर्नर येथे ९ फेब्रुवारीला राज्यस्तरीय संमेलन होणार असल्याचे सचिव विलास पंचभाई यांनी जाहीर केले, या संमेलनानिमित्त खुले कविसंमेलन, निमंत्रितांचे कविसंमेलन, चर्चासत्र, परिसंवाद, कथाकथन, वाड्मय व नाशिकभूषण पुरस्कार वितरण आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाला साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

2 hours ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

14 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago