Floods Washed Away Homes but Revived Humanity – A Poem by Sujoy Desai
काय मिळालं त्या पावसाला,
मिळालं काय त्या महापुराला ?
त्राही-त्राही झाली तना-मनांची साऱ्याच
आवरावे कसे आता जिवलगांच्या शोकाला ?
माझ्या माणसांच्या स्वप्नासह - घरकुलेही वाहून गेली
मोठ्या घरट्यातील जीवही बळी पडले थैमानाला!
कोणी कोणास आवरावे? कसे सावरावे ?
युध्दगती आली साऱ्या बांधवांच्या प्रयत्नाला
मोठया आकांताने जीव जीवांसाठी धावला
जणू शिव अल्लासाठी अन अल्ला शिवासाठी धावला
माणूस माणसासाठी धावला हा बोध मज पावला
माणसातील देव आज, देवासाठी माणसातील घावला !
या पुराने वाहून नेले यासह बरेच काही
अहंकारालाही नेले वाहून, नेले जाती धर्माला
आणिले मात्र जवळ त्याने मानवा मानवाला.
अन् पालवी फुटली महापुरातही माणुसकीच्या वटवृक्षाला
माणुसकीच्या वटवृक्षाला
कवी - सुजय सुंदरराव देसाई,
शिक्षक, म. दु. श्रेष्ठी समता हायस्कूल.
मो. ९७६२५३२२९१
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…