आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

मान्सूनची प्रगती

संपूर्ण उत्तर भारतात मान्सून त्याच्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे म्हणजे त्याचे सरासरी तारखेचे सातत्य ठेवून सध्या बरोबर पुढे झेपावत आहे. सध्या देशाचा साधारण ८५ % भाग मान्सून ने व्यापला असुन पुढील १५ दिवसात कदाचित तो संपूर्ण देश काबीज करण्याची शक्यता जाणवते.
           गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीत मान्सून जबरदस्तपणे कोसळत आहे.
          कोकण किनारपट्टीप्रमाणे संपूर्ण गुजराथ व मध्यप्रदेशातही मान्सून सेट झाला आहे. त्याच्या प्रेरित परिणामातूनच महाराष्ट्रातील खान्देश-नाशिक सह मध्य महाराष्ट्रात मान्सून-पावसाच्या आशा काहींश्या पल्लवीत झाल्या आहे,

-मध्य महाराष्ट्रातील पाऊस-

           आजपासुन  पुढील सात दिवस म्हणजे शनिवार दि.२८ जून पर्यन्त नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सह मराठवाड्यातील छ.सं.नगर व जालना  जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
         ह्या जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मात्र जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.

मराठवाड्यातील पाऊस !

                            छत्रपती संभाजीनगर, जालना असे दोन जिल्हे वगळता बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुढील १० दिवस म्हणजे मंगळवार दि.१ जुलैपर्यन्त केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
                         

विदर्भातील पाऊस-

            मंगळवार दि. २४ जून पासुन पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि.२८ जून पर्यन्त विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.
            उर्वरित वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मात्र  मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

-कोकणातील पाऊस-

                          मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील १० दिवस म्हणजे मंगळवार दि.१ जुलैपर्यन्त जूनपर्यंत सध्या जाणवतो तसा जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहे.   
                             

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

10 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

23 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago