कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात साचलेला कचरा वाढत्या प्रदुषणाचे संकेत देत आहे. हे केवळ पाण्याचे प्रदुषण नाही तर विषयुक्त अन्न निमिर्तीही होत असल्याचा पुरावा आहे. याकडे आता गांभिर्याने पाहाण्याची गरज आहे. या संदर्भात एखादे रोल मॉडेल विकसित करून एकात्मिक उपाययोजना करण्याची गरज आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

वाढत्या नागरिकरणामुळे शहरे मोठे होऊ लागली आहेत. तसे शहरातील सांडपाणी कोठे सोडायचे याकडे प्रशासनाचे, नियोजन समित्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील पूर्वीचे नाले आता सांडपाण्याची गटारे झाली आहेत. हे नाले थेट नदीत मिसळत असल्याने नदीतील शुद्ध पाणी प्रदुषित होत आहे. हा प्रश्न भारतातील सर्वच नद्यामध्ये पाहायला मिळतो. सांडपाण्याची व्यवस्था न केल्याने नद्या प्रदुषित झाल्या आहेत. औद्योगिक वसाहतीचेही पाणी कोणत्याही प्रक्रियेविना नदीत सोडले जात असल्याने नदीतील जैवविविधता धोक्यात आली आहे. याबाबत जागरूकता निर्माण करून वाढते नदी प्रदुषण थांबवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

आत्तापर्यंत नदीत सांडपाणीच होते पण आता वाढलेला प्लास्टिक कचराही पुराच्या पाण्यासोबत नदीत वाहून येत आहे. हे प्रदुषण गांभिर्याने घेण्याची गरज आहे. नदी पात्रात बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात हा कचरा सर्वत्र पाहायला मिळतो. आत्तापर्यंत पुराने मोडलेल्या झाडांचे अवशेष या बंधाऱ्यात पाहायला मिळायचे पण आता प्लास्टिक पिशव्यांचा कचरा अन् अन्य वस्तूही या बंधाऱ्यात पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच बंधाऱ्यात हे चित्र पाहायला मिळते. अशाने आपणास रोज नदीतून मिळणारे पाणी किती शुद्ध आहे याची कल्पना येऊ शकेल. शेतीला हेच पाणी दिले जाते अशाने घातक रसायनेयुक्त पाणी पिकातील धान्यात येते. हेच धान्य आपण खातो. विषमुक्त उत्पादनाची गरज ही यासाठी भासत आहे. या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देऊन एकात्मिक उपाययोजना करण्याची गरज आहे. या संदर्भात एखादे रोल मॉडेल विकसित करून देशातील सर्वच नद्यावर याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

हा कचरा केवळ प्रदुषणच करत नाही तर बंधाऱ्याचे आयुष्यही कमी करतो. कचऱ्याचा फटका बंधाऱ्याला बसतो आहे. हेही तितकेच लक्षात घेणे गरजेचे आहे. बंधाऱ्यात अडकलेल्या ओंडक्यामुळे बंधाऱ्यास धोका निर्माण होतो. पाण्याचा दाब त्यावर पडल्याने ओंडक्यामुळे बंधाऱ्याचे नुकसान होते. केवळ बंधारे बांधले म्हणजे काम झाले असे न होता त्याची देखभाल दुरूस्तीचाही, योग्य निगा राखण्याचाही विचार नियोजनात व्हायला हवा.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

8 hours ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

14 hours ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

1 day ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

2 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

3 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

3 days ago