Poem on Rangpachami by Sunetra Vijay Joshi
पुन्हा एकदा रास रंगू दे
फिरून वाजू दे तीच बासरी
पुन्हा सुखदुःखास विसरुनी
फेर धरू दे यमुनातिरी…
पुन्हा रंग फेक गुलाबी
प्रेम रंगात पुन्हा न्हाऊ दे
सोडून द्वारका सखा श्रीहरी
पुन्हा भेटण्या मला येऊ दे..
तुझ्या निळाईत गौर काया
पुन्हा सावळी मला होऊ दे
तुझ्यात विलीन होऊन मोहना
भक्तिरसातच चिंब भिजू दे..
असा रंग तू लाव मला
कधीही जो फिका न पडो
रंगात रंगुनी सावळ्याच्या
त्या कृष्णाशी ऐक्य जडो…
अशी होऊ दे रंगपंचमी
माझे रुप कुणा न कळू दे
बघेल मला जर कुणी तयाला
तूच तूच सर्वत्र दिसू दे..
सौ सुनेत्रा विजय जोशी,
रत्नागिरी.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…