Poem on Rangpachami by Sunetra Vijay Joshi
पुन्हा एकदा रास रंगू दे
फिरून वाजू दे तीच बासरी
पुन्हा सुखदुःखास विसरुनी
फेर धरू दे यमुनातिरी…
पुन्हा रंग फेक गुलाबी
प्रेम रंगात पुन्हा न्हाऊ दे
सोडून द्वारका सखा श्रीहरी
पुन्हा भेटण्या मला येऊ दे..
तुझ्या निळाईत गौर काया
पुन्हा सावळी मला होऊ दे
तुझ्यात विलीन होऊन मोहना
भक्तिरसातच चिंब भिजू दे..
असा रंग तू लाव मला
कधीही जो फिका न पडो
रंगात रंगुनी सावळ्याच्या
त्या कृष्णाशी ऐक्य जडो…
अशी होऊ दे रंगपंचमी
माझे रुप कुणा न कळू दे
बघेल मला जर कुणी तयाला
तूच तूच सर्वत्र दिसू दे..
सौ सुनेत्रा विजय जोशी,
रत्नागिरी.
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…
बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…
कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…
स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…