शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परतीच्या मार्गावरील मान्सून सप्ताहभर जाग्यावरच थबकणार

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

१-परतीचा पाऊस  जाग्यावरच स्थिर –

                      महाराष्ट्रातील सध्य:स्थितीतील तीव्र वातावरणीय प्रणालीमुळे देशात परतीच्या मार्गांवर असलेला मान्सून, शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पर्यन्त, वेरावळ, भरूच, उज्जैन, झाशी, शहाजहाणपूर ह्या शहरादरम्यानच्या सीमारेषेवर मान्सून सप्ताहभर जाग्यावरच थबकण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण पूरकतेची शक्यता टिकून राहू शकते.

२-हवेच्या तीव्र  कमी दाबात रूपांतर-

                  अपेक्षित असलेल्या कमी दाबाचे आज पहाटे तीव्र  कमी दाबात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत अपेक्षित असलेल्या जोरदार पावसाला ही प्रणाली पूरक ठरण्याची शक्यता कायम जाणवते.

                   मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार
       
                      हवेच्या तीव्र  कमी दाब वातावरण प्रणालीच्या नेमक्या प्रभावी टप्प्यात सापडलेल्या दक्षिण मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच सोलापूर जिल्हा क्षेत्रात मंगळवार दि. ३० सप्टेंबर पासुन २-३ दिवस पावसासाठी काहीशी उघडीप मिळू शकते असे वाटते.
                       

३-पूरजन्य परिस्थितीची शक्यता

                      संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व जळगांव, नाशिक, अहिल्यानगर व सोलापूर अश्या महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात, मंगळवार दि. ३० सप्टेंबर पर्यंतच्या ४ दिवसात पूरजन्य परिस्थितीची शक्यता जाणवत असुन धरण क्षेत्रातून नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते.
               

४-अंदमानजवळ तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आता वायव्येकडे सरकणार-

     
                      मंगळवार दि. ३० सप्टेंबर दरम्यान अंदमानजवळ बंगाल उप सागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार  होण्याची शक्यता व  त्याचे  उत्तर व उत्तर मध्य भारताकडे होण्याच्या मार्गक्रमण शक्यतेतून महाराष्ट्रात दि. ८ ते ९ ऑक्टोबर दरम्यानच्या पावसाच्या चौथ्या आवर्तनाच्या  धोका  कमी जाणवतो, असे वाटते.                  

५-दसऱ्यानंतर उघडीपीची शक्यता-

                     शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पासुन महाराष्ट्रात पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते. मुंबईत मात्र दसऱ्यानंतरही पावसाची शक्यता कायम जाणवते.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

5 hours ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

1 day ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

2 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

2 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

3 days ago