काय चाललयं अवतीभवती

कडा येथील साहित्यज्योती पुरस्कार जाहीर

कडा येथील साहित्यज्योती पुरस्कार जाहीर

कडा ( ता. आष्टी, जि. बीड) येथील साहित्यज्योती काव्य मंचाच्यावतीने कथा, कादंबरी, कवितासंग्रह या साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येतात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त या राज्यस्तरीय साहित्यज्योती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार निवड प्रक्रियेमध्ये डॉ जी पी बोडखे, डॉ. अभय शिंदे, हरिष हातवटे. माधव सावंत, इंद्रकुमार झांजे, संगिता होळकर, मधुचंद्र राऊत, वि. भा. साळुंखे, दिनेश पोकळे, संदिप पाचारणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती नागेश शेलार यांनी दिली आहे. यावेळी २०१९, २०२०, २०२१ असे तीन वर्षांचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

जाहीर झालेले पुरस्कार असे –

पुरस्कार सन २०१९

कविता संग्रह –

माती शाबूत राहावी म्हणून.. – विरेंद्र मिरेवाड (नांदेड)
माझ्या हयातीचा दाखला – डॉ. विशाल इंगोले (बुलडाणा)

कथा संग्रह –

वाताहत” – डॉ. अनंता सुर (चंद्रपूर),
परतीचा पाऊस – यशवंत माळी ( सांगली )

कादंबरी –

पिपिलीका मुक्तिधाम – डॉ. बाळासाहेब लबडे (रत्नागिरी)

पुरस्कार सन २०२०

कविता संग्रह

तुकोबाच्या कुळाचा वंश – संतोष कांबळे (मालेगाव)
चैत्रचाहूल – योगिता राजकर (सातारा)

कथा संग्रह

फिंट्री – सप्तर्षी माळी (नाशिक)
गावकुसाल्या गोष्टी – डॉ. शिवाजी काळे (अहमदनगर)

कादंबरी

फिरत्या चाकावरती – डॉ. बाबुराव उपाध्ये (श्रीरामपूर)

पुरस्कार सन २०२१

कविता संग्रह

आम्ही फुले बोलतोत – भारत सातपुते (लातूर)
निलमोहर – जयश्री वाघ (नाशिक)

कथा संग्रह

बाईचा दगड – डॉ. भास्कर बडे (बीड)
दमकोंडी – ज्योती सोनवणे ( छत्रपती संभाजीनगर)

कादंबरी

पाऊसकाळ – विजय जाधव (सांगली)

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

नबीन यांच्या ‘ड्रीम टीम’मध्ये धक्के अन् संकेत; तावडेंची महाराष्ट्रावर नजर, मालविय बाहेर

स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी…

8 hours ago

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

1 day ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

2 days ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

2 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

3 days ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

3 days ago