काय चाललयं अवतीभवती

साहित्यकणा फाउंडेशन संस्थेतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

नाशिक – महाराष्ट्रातील उत्कृष्ठ साहित्यकृतीचा गौरव करावा आणि प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशनच्यावतीने साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी ०१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरीबालसाहित्य (कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटक) पाठविण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती साहित्यकणा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय द. गोराडे ( मो. नं – ९८५०६९१२१६ ) यांनी दिली आहे.

देण्यात येणारे पुरस्कार असे –
१. सुमनताई पंचभाई स्मृती कवितासंग्रह पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.
२. मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.
३. शिलाताई गहिलोत-राजपूत कादंबरी पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.
४. प्रा. संगीता मुठाळ स्मृती बालसाहित्य पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.

१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व बालसाहित्य (कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटक) या पुस्तकांच्या दोन-दोन प्रती संस्थेच्या पत्त्यावर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पाठवाव्यात.

साहित्य पाठवण्यासाठी पत्ता :
विलास पंचभाई (सचिव),
साइसिद्धी अपार्टमेंट, प्लॅट नं – ५, विनायकनगर, टी. बी. सॅनिटरियमजवळ, देवधर कॉलेज समोर, मेरी, दिंडोरी रोड, नाशिक – ४२२००१
अधिक माहितीसाठी संपर्क – ७७७४९५५८९२

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

1 hour ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

14 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

19 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

1 day ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

1 day ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

2 days ago