May 12, 2026
Sahitya Kana Foundation calls for sending books for literary awards
Home » साहित्यकणा फाउंडेशन संस्थेतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

साहित्यकणा फाउंडेशन संस्थेतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

नाशिक – महाराष्ट्रातील उत्कृष्ठ साहित्यकृतीचा गौरव करावा आणि प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशनच्यावतीने साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी ०१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व बालसाहित्य (कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटक) पाठविण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती साहित्यकणा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय द. गोराडे ( मो. नं – ९८५०६९१२१६ ) यांनी दिली आहे.

देण्यात येणारे पुरस्कार असे –
१. सुमनताई पंचभाई स्मृती कवितासंग्रह पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.
२. मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.
३. शिलाताई गहिलोत-राजपूत कादंबरी पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.
४. प्रा. संगीता मुठाळ स्मृती बालसाहित्य पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.

१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व बालसाहित्य (कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटक) या पुस्तकांच्या दोन-दोन प्रती संस्थेच्या पत्त्यावर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पाठवाव्यात.

साहित्य पाठवण्यासाठी पत्ता :
विलास पंचभाई (सचिव),
साइसिद्धी अपार्टमेंट, प्लॅट नं – ५, विनायकनगर, टी. बी. सॅनिटरियमजवळ, देवधर कॉलेज समोर, मेरी, दिंडोरी रोड, नाशिक – ४२२००१
अधिक माहितीसाठी संपर्क – ७७७४९५५८९२

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

साताऱ्यातील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर

सीमा वाद हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न – सुभाष देसाई

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रजनीश कामत

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!