नाशिक – महाराष्ट्रातील उत्कृष्ठ साहित्यकृतीचा गौरव करावा आणि प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशनच्यावतीने साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी ०१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व बालसाहित्य (कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटक) पाठविण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती साहित्यकणा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय द. गोराडे ( मो. नं – ९८५०६९१२१६ ) यांनी दिली आहे.
देण्यात येणारे पुरस्कार असे –
१. सुमनताई पंचभाई स्मृती कवितासंग्रह पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.
२. मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.
३. शिलाताई गहिलोत-राजपूत कादंबरी पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.
४. प्रा. संगीता मुठाळ स्मृती बालसाहित्य पुरस्कार :- रोख रक्कम २१०० रुपये व सन्मान चिन्ह.
१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व बालसाहित्य (कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटक) या पुस्तकांच्या दोन-दोन प्रती संस्थेच्या पत्त्यावर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पाठवाव्यात.
साहित्य पाठवण्यासाठी पत्ता :
विलास पंचभाई (सचिव),
साइसिद्धी अपार्टमेंट, प्लॅट नं – ५, विनायकनगर, टी. बी. सॅनिटरियमजवळ, देवधर कॉलेज समोर, मेरी, दिंडोरी रोड, नाशिक – ४२२००१
अधिक माहितीसाठी संपर्क – ७७७४९५५८९२
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
