काय चाललयं अवतीभवती

छत्रपती संभाजीनगर येथील साक्षात कार्यक्रमात कवी अजय कांडर निमंत्रित

कवितेची निर्मिती प्रक्रिया व्याख्यान आणि साहित्य रसिकांशी बातचीत

छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा साहित्य परिषद मराठीतील प्रमुख लेखक, कवी, नाटककार यांच्याशी रसिकांचा संवाद घडून आणण्यासाठी साक्षात या उपक्रमाचे आयोजन करत असते. यावेळी या उपक्रमात नामवंत कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार 7 मार्च रोजी सायं. 5.30 वा. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर येथे मराठीतील प्रमुख लेखक कवी आणि नाटककार यांच्याशी संवाद साधणारा साक्षात हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील विख्यात साहित्यिकांना यासाठी निमंत्रित करताना या कार्यक्रमात त्यांचं त्यांच्या लेखन प्रवासाविषयी, साहित्यिक भूमिकेबद्दल व समकालीन लेखक कवींच्या लेखनाविषयी भाष्य अपेक्षित असते. त्यानंतर निमंत्रित साहित्यिकाशी रसिकांचा संवाद ठेवला जातो. या कार्यक्रमात कवी कांडर स्वतःच्या काव्य निर्मितीच्या प्रवासाविषयी, लेखन भूमिकेविषयी आणि समकालीन लेखक कवींविषयी भाष्य करणार आहेत.

कवी अजय कांडर हे मराठीतील आजचे महत्त्वाचे कवी असून त्यांनी प्रयोगशील कविता लिहिली आहे सातत्याने त्यांनी दीर्घ कविता लिहिली असून त्यांचे हत्ती इलो, युगानुयुगे तूच आणि अजूनही जिवंत आहे गांधी हे तीन दीर्घ कवितेचे संग्रह बहुचर्चित आहेत. त्यातील हत्ती इलो आणि युगानुयुगे तूच या दोन संग्रहांवरील नाटके त्यांची बहुचर्चित ठरली आहेत. यातही युगानुयुगे तूच या नाटकाचे प्रयोग सध्या मुंबईच्या रंगभूमीवर सातत्याने सादर होत आहेत.

तर आवानओल हा त्यांचा सर्व दूर पसरलेल्या कष्टकरी बायांचं जगणं मांडणारा काव्यसंग्रह लक्षवेधी ठरला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील बदलत्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पर्यावरणासंदर्भात कठोर भाष्य करणारी कविता लिहून मराठी ग्रामीण कवितेलाच बळकटी दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर कवी अजय कांडर यांना साक्षात या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Ajay KandarAurangabad literature eventauthor interactionauthor speechbook discussionChhatrapati Sambhajinagar eventcontemporary Marathi poetscreative discussion eventcreative writing talkcultural interactionIndian language literatureIndian poetry forumIndian regional literatureliterary audience interactionliterary discussionliterary forum MaharashtraLiterary Gatheringliterary seminarliterary talkliterature and societyliterature lovers meetMaharashtra cultural programMaharashtra LiteratureMaharashtra poetry circleMarathi authorsMarathi book loversMarathi Cultural EventMarathi intellectual eventMarathi KavitaMarathi LiteratureMarathi long poemsMarathi PoetMarathi poetryMarathi stage eventMarathi writers forumMarathwada Sahitya Parishadpoetic journey talkpoetry analysis sessionpoetry creation processpoetry dialoguepoetry lecturepoetry performancePoetry Readersregional writers meetRural PoetrySahitya event IndiaSahitya Parishad eventSakshat programwriter meetअजय कांडरअजूनही जिवंत आहे गांधीआवानओलकणकवली प्रतिनिधीकविता व्याख्यानकविता सादरीकरणकवितेची निर्मिती प्रक्रियाकवितेवरील चर्चाकाव्यविश्लेषणकाव्यसंग्रहग्रामीण कविताग्रामीण वास्तवछत्रपती संभाजीनगर कार्यक्रमदीर्घ कवितामराठवाडा साहित्य परिषदमराठी कवीमराठी काव्यमराठी काव्यपरंपरामराठी पुस्तक प्रेमीमराठी बौद्धिक कार्यक्रममराठी रंगभूमीमराठी साहित्यमराठी साहित्य चळवळमराठी साहित्यविश्वमहाराष्ट्र सांस्कृतिक वारसामहाराष्ट्र साहित्ययुगानुयुगे तूचलेखक भेटलेखक संवादलेखक-कवी संवादलेखकांचे भाषणवाचक भेटसमकालीन कवीसर्जनशील लेखनसाक्षात उपक्रमसामाजिक भाष्यसांस्कृतिक कार्यक्रमसांस्कृतिक व्यासपीठसांस्कृतिक संवादसाहित्य अभ्याससाहित्य कार्यक्रम महाराष्ट्रसाहित्य चर्चासाहित्य मंचसाहित्य रसिकसाहित्य संमेलनसाहित्य संवादसाहित्यिक प्रवाससाहित्यिक भूमिकासाहित्यिक भेटहत्ती इलो

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

4 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

8 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

17 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

18 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago