काय चाललयं अवतीभवती

निगडीतील मातृमंदिर संस्थेच्यावतीने पुरस्कारासाठी संत साहित्यावरील पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाड.मय अभ्यासावर आधारित स्पर्धा
विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाड.मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध व्हावे हा उद्देश
हा पुरस्कार प्रदान सोहळा प्रतिवर्षी मातृमंदिर वर्धापनदिनी म्हणजे सौर १ मार्गशीर्ष ( २२ नोव्हेंबर ) या दिवशी

पुणे – निगडी येथील मातृमंदिर संस्थेच्यावतीने पुरस्कारासाठी संत साहित्यावरील पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, पुस्तके १५ ऑगस्टपूर्वी संस्थकडे पाठवावीत, अशी माहिती सु. मा. कुलकर्णी यांनी दिली आहे

येथील मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाड.मय अभ्यासावर आधारित स्पर्धा घेत असते. विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाड.मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध झाले पाहिजे असें वाटते. असें वाड.मय विविध शाळांना सुचवता यावे, वाड.मय वाचकांसमोर ठेवणारे लेखक आणि प्रकाशक यांना प्रोत्साहन देता यावे, त्यासाठी पुरस्कार देण्याच्या निमित्ताने लेखक आणि प्रकाशक वाचकांसमोर यावेत या हेतूने संत वाड.मयविषयक पुस्तकांना पुरस्कार संस्थेतर्फे देण्यात येतात. हा पुरस्कार प्रदान सोहळा प्रतिवर्षी मातृमंदिर वर्धापनदिनी म्हणजे सौर १ मार्गशीर्ष ( २२ नोव्हेंबर ) या दिवशी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, पुणे 44 या ठिकाणी आयोजित केला जातो.

पूर्वीच्या दोन सौर वर्षात प्रकाशित झालेल्या संतविषयक मराठी साहित्याचा पुरस्कारासाठी विचार केला जातो. ( मागील दोन इसवी सनामध्ये प्रकाशित झालेले साहित्य ). यामध्ये संत साहित्याचे परीक्षण ( टीका, विवेचन ) संतचरित्रे, संताच्या कार्यावरील विवेचनात्मक लेखन, संत जीवनावर आधारित ललित साहित्य ( कथा, कादंबरी, काव्यकोश इत्यादी सर्व प्रकारचे साहित्य ) पुरस्कारासाठी दोन प्रतीत पाठविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. १०० पेक्षा अधिक पृष्ठांच्या मोठ्या सर्वोत्कृष्ट दोन पुस्तकांना अनुक्रमे रु. १०,००० /- आणि रु .८००० /- असें दोन पुरस्कार (६० % लेखकांस आणि ४० % प्रकाशकांस ) दिले जातात. त्याशिवाय बालवाड.मयातील ( १०० पृष्ठांच्या आतील ) संतकथा, संतचरित्र, संतवचनसंग्रह अशा स्वरूपातील दोन पुस्तकांना ( ६० % लेखकास/ ४० % रक्कम प्रकाशकास या प्रमाणात ) प्रत्येकी रु. २५००/- चे पुरस्कार दिले जातात.

संस्थेकडून संतसाहित्याचे समीक्षक किंवा लेखक अशा तीन ख्यातनाम तज्ञाच्या समितीकडून परीक्षण करून पुरस्कारांची पात्रता ठरवली जाते. तरी इच्छुक लेखक – प्रकाशकांनी पुरस्कारासाठी प्रत्येक पुस्तकाच्या दोन प्रती सौर २४ श्रावण (१५ ऑगस्ट) पर्यंत संस्थेकडे पाठवावीत. पुस्तके मराठी भाषेतील तथापि कोणत्याही भारतीय संताविषयीची असावीत. संत कोणत्याही कालखंडातील असले तरी चालेल.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
मातृमंदिर विश्वस्त संस्था, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्र. २५, निगडी, पुणे ४११०४४
दूरभाष क्र. २७१६८००० / ९७६५१३५७६९

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: १५ ऑगस्ट अंतिम मुदत२०२५ साहित्य पुरस्कारaward submission 2025book awards 2025book awards August 15book entry deadlinedevotional book awardsIndian authorsIndian literature submissionliterature contest Indialiterature invitationMarathi book awardsMarathi religious booksMarathi spiritualityMarathi writersMatrumandir announcementMatrumandir SansthaNigdi cultural organizationreligious writing IndiaSant literature awardSant poetsSant Sahitya booksSant Sahitya competitionspiritual literature IndiaSu Ma Kulkarnisubmit books Indiaअध्यात्मिक साहित्यधार्मिक पुस्तकेनिगडी संस्थापुरस्कारासाठी पुस्तकेपुस्तक पाठवापुस्तक सादरीकरणपुस्तक स्पर्धापुस्तकांची निवडमराठी अध्यात्ममराठी धार्मिक साहित्यमराठी पुस्तकेमराठी लेखकमराठी साहित्य पुरस्कारमातृमंदिर संस्थासंत काव्यसंत ग्रंथसंत साहित्यसंत साहित्य पुरस्कारसंत साहित्य सन्मानसाहित्य पाठवासाहित्य संमेलनसाहित्य संस्थासु. मा. कुलकर्णी

Recent Posts

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

7 hours ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

21 hours ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

22 hours ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 day ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 days ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

2 days ago