काय चाललयं अवतीभवती

शब्दगंधचे २०२३ व २०२४ चे साहित्य पुरस्कार जाहीर

अहिल्यानगर – “सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन निमित्ताने देण्यात येणारे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ‘मायावी’,’’ ’अस्वस्तायन आणि चंद्रदर्शन’, ‘सिझर न झालेल्या कविता’ या पुस्तकांना जाहिर करण्यात येत असल्याची माहिती शब्दगंध चे कार्यवाह भारत गाडेकर व प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड यांनी दिली.

शब्दगंध साहित्यिक परिषदेची बैठक अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, प्राचार्य जी पी ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. त्यावेळी परिक्षण समितीचे सदस्य कवयित्री शर्मिला गोसावी, प्रा.डॉ.अनिल गर्जे, सुभाष सोनवणे, भगवान राऊत, अरुण आहेर, ऋता ठाकूर यांनी २०२३ चा निकाल जाहीर केला.

राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार २०२३ असे –

कथासंग्रह ‘मायावी’,सुनील जाधव,पालघर, काव्यसंग्रह ‘अस्वस्तायन आणि चंद्रदर्शन’,बाळू दुगडूमवार, नायगाव व ‘सिजर न झालेल्या कविता’ डॉ. सुनील पवार, मेहकर,, संकीर्ण ‘यशाची सूत्रे’, रोहिदास पोटे, मुंबई, बाल वाड:मय ‘फुलपाखरू’, तुकाराम खिलारी,परभणी, काव्यसंग्रह ‘भावांजली’, प्रा.मीरा निचळे, अमरावती यांना जाहीर करण्यात आले.

जिल्हास्तरीय पुरस्कार जीवनचरित्र ‘एक होती आशा’,प्रकाश खंडागळे,जामखेड, कादंबरी ‘मुक्ता मुक्त झाली’,साहेबराव तुपे,लोणी, काव्यसंग्रह ‘ते दिवस आठवून बघ’,डॉ.अशोक शिंदे,कोल्हार यांना जाहीर करण्यात येत आहेत. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.

त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन,परिसंवाद,चर्चासत्र,कथा-काव्य लेखन स्पर्धा,विविध पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन,बालसंस्कार शिबीर ई उपक्रम राबविण्यात येतात. त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय वाड:मय स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल,बुके,पुस्तक भेट व साहित्य संमेलनात सहभाग असे पुरस्काराचे स्वरूप असून रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालय,अहिल्यानगर येथे कवयित्री संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.

पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे जयश्री झरेकर, स्वाती ठुबे, शर्मिला गोसावी, सुरेखा घोलप, शर्मिला रणधीर, सुनिता पालवे प्रा.डॉ.वैशाली आहेर,प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, आरती गिरी, वर्ष भोईटे यांनी अभिनंदन केले आहे.

२०२४ च्या पुस्तकांचे परीक्षण प्रा.डॉ.संजय दवंगे, भाऊसाहेब सावंत, प्रा.डॉ.किशोर धनवटे, सुरेखा घोलप, शर्मिला गोसावी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

२०२४ चे पुरस्कार विजेते असे –

कादंबरी ‘तडजोड’ निवृत्ती जोरी, संभाजीनगर, कथासंग्रह ‘साकव’ संगीता पुराणिक,पुणे, काव्यसंग्रह ‘तळ हातावर उगवलेल्या कविता’ सुनील कोंडके व ‘दंगल होतेच कशी ?’ गौतम डोके, बडनेरा आत्मकथन ‘निवडुंगाची काटे’, जी.जी.कांबळे,लातूर, नाटक प्रभाकर दुपारे ‘समग्र नाटक प्रभाकर दुपारे’,नागपूर, व्यक्तिचित्रण ‘जिव्हाळ्याची माणसं’, भास्कर बंगाळे, पंढरपूर, ललित ‘ऑल इज वेल’ विनय मिरासे, यवतमाळ, संशोधन ग्रंथ ‘मराठी तेलगू भाषिक अनुबंध’ डॉ. दत्ताराम राठोड, अमरावती, बाल वाड:मय ‘गंपूच्या गोष्टी’ गौरव भुकन, केडगाव, प्रतिनिधीक काव्यसंग्रह ‘काव्यसंकल्प’ प्रा.हनुमान माने, बारामती, संकीर्ण ‘संत तुकाराम एक चिंतन’ प्रा. डॉ. सुभाष बागल, खुलदाबाद यांना जाहिर करण्यात आले

२०२४ चे जिल्हास्तरीय पुरस्कार काव्यसंग्रह वेदना, गोकुळ गायकवाड, जामखेड, देव माणसं, दिलीप सोनवणे संगमनेर यांना जाहीर करण्यात आला आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

8 hours ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

17 hours ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

1 day ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

1 day ago

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

2 days ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

2 days ago