April 11, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
Shabdgandh's 2023 and 2024 Literary Awards announced
Home » शब्दगंधचे २०२३ व २०२४ चे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

शब्दगंधचे २०२३ व २०२४ चे साहित्य पुरस्कार जाहीर

अहिल्यानगर – “सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन निमित्ताने देण्यात येणारे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ‘मायावी’,’’ ’अस्वस्तायन आणि चंद्रदर्शन’, ‘सिझर न झालेल्या कविता’ या पुस्तकांना जाहिर करण्यात येत असल्याची माहिती शब्दगंध चे कार्यवाह भारत गाडेकर व प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड यांनी दिली.

शब्दगंध साहित्यिक परिषदेची बैठक अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, प्राचार्य जी पी ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. त्यावेळी परिक्षण समितीचे सदस्य कवयित्री शर्मिला गोसावी, प्रा.डॉ.अनिल गर्जे, सुभाष सोनवणे, भगवान राऊत, अरुण आहेर, ऋता ठाकूर यांनी २०२३ चा निकाल जाहीर केला.

राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार २०२३ असे –

कथासंग्रह ‘मायावी’,सुनील जाधव,पालघर, काव्यसंग्रह ‘अस्वस्तायन आणि चंद्रदर्शन’,बाळू दुगडूमवार, नायगाव व ‘सिजर न झालेल्या कविता’ डॉ. सुनील पवार, मेहकर,, संकीर्ण ‘यशाची सूत्रे’, रोहिदास पोटे, मुंबई, बाल वाड:मय ‘फुलपाखरू’, तुकाराम खिलारी,परभणी, काव्यसंग्रह ‘भावांजली’, प्रा.मीरा निचळे, अमरावती यांना जाहीर करण्यात आले.

जिल्हास्तरीय पुरस्कार जीवनचरित्र ‘एक होती आशा’,प्रकाश खंडागळे,जामखेड, कादंबरी ‘मुक्ता मुक्त झाली’,साहेबराव तुपे,लोणी, काव्यसंग्रह ‘ते दिवस आठवून बघ’,डॉ.अशोक शिंदे,कोल्हार यांना जाहीर करण्यात येत आहेत. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.

त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन,परिसंवाद,चर्चासत्र,कथा-काव्य लेखन स्पर्धा,विविध पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन,बालसंस्कार शिबीर ई उपक्रम राबविण्यात येतात. त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय वाड:मय स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल,बुके,पुस्तक भेट व साहित्य संमेलनात सहभाग असे पुरस्काराचे स्वरूप असून रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालय,अहिल्यानगर येथे कवयित्री संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.

पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे जयश्री झरेकर, स्वाती ठुबे, शर्मिला गोसावी, सुरेखा घोलप, शर्मिला रणधीर, सुनिता पालवे प्रा.डॉ.वैशाली आहेर,प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, आरती गिरी, वर्ष भोईटे यांनी अभिनंदन केले आहे.

२०२४ च्या पुस्तकांचे परीक्षण प्रा.डॉ.संजय दवंगे, भाऊसाहेब सावंत, प्रा.डॉ.किशोर धनवटे, सुरेखा घोलप, शर्मिला गोसावी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

२०२४ चे पुरस्कार विजेते असे –

कादंबरी ‘तडजोड’ निवृत्ती जोरी, संभाजीनगर, कथासंग्रह ‘साकव’ संगीता पुराणिक,पुणे, काव्यसंग्रह ‘तळ हातावर उगवलेल्या कविता’ सुनील कोंडके व ‘दंगल होतेच कशी ?’ गौतम डोके, बडनेरा आत्मकथन ‘निवडुंगाची काटे’, जी.जी.कांबळे,लातूर, नाटक प्रभाकर दुपारे ‘समग्र नाटक प्रभाकर दुपारे’,नागपूर, व्यक्तिचित्रण ‘जिव्हाळ्याची माणसं’, भास्कर बंगाळे, पंढरपूर, ललित ‘ऑल इज वेल’ विनय मिरासे, यवतमाळ, संशोधन ग्रंथ ‘मराठी तेलगू भाषिक अनुबंध’ डॉ. दत्ताराम राठोड, अमरावती, बाल वाड:मय ‘गंपूच्या गोष्टी’ गौरव भुकन, केडगाव, प्रतिनिधीक काव्यसंग्रह ‘काव्यसंकल्प’ प्रा.हनुमान माने, बारामती, संकीर्ण ‘संत तुकाराम एक चिंतन’ प्रा. डॉ. सुभाष बागल, खुलदाबाद यांना जाहिर करण्यात आले

२०२४ चे जिल्हास्तरीय पुरस्कार काव्यसंग्रह वेदना, गोकुळ गायकवाड, जामखेड, देव माणसं, दिलीप सोनवणे संगमनेर यांना जाहीर करण्यात आला आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

गुंडी उचलण्याची प्रथा…

कर्तव्याची ज्योत सतत पेटती ठेवणं हीच अग्निसेवा

स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!